शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कृषी, वस्त्रोद्योग कंपन्यांवर छापे, 27 ठिकाणी IT ची छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 05:47 IST

27 ठिकाणी प्राप्तिकर विभागाची छापेमारी, 1.40 कोटींची रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील एका मोठ्या उद्योग समूहावर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी छापेमारी करत सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी मुंबई आणि दिल्ली येथे २७ ठिकाणी छापेमारी केली.मिळालेल्या माहितीनुसार, कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत या समूहाने शेअर बाजारात कार्यरत आपल्या विविध कंपन्यांच्या समभागांच्या किमतीमध्ये वाढ करण्यासाठी या कंपन्यांचा नफा वाढवून दाखविला. यासाठी खरेदी-विक्रीचे अनेक बनावट आणि कागदोपत्री व्यवहार करत त्यातील नफेखोरी वाढवून दाखवली. याचा परिणाम कंपनीच्या समभागांच्या किमती वाढण्याच्या दृष्टीने झाला. 

संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे सापडलीयाशिवाय, समूहातील दोन कंपन्यांत कागदोपत्री व्यवहार दाखवत तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार हे रोखीने केल्याचेही दिसून आले. याचप्रकारे समूहातील दुसऱ्या दोन कंपन्यांत १५० कोटी रुपयांचे व्यवहारही रोखीने झाल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासादरम्यान दिसून आले. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संशयास्पद व्यवहारांची अनेक कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली असून, याचसोबत संगणकदेखील जप्त केला आहे.

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस