शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अंबानी-अदानींवर एका बाजूला सडकून टीका अन् राजस्थानात काँग्रेस सरकारनंच अदानींना दिली १६०० हेक्टर जमीन; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:38 IST

राजस्थानातील काँग्रेस सरकारनं सोलर पार्कसाठी राज्यातील १६०० हेक्टर जमीन नुकतीच अदानी ग्रूपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे, याच मुद्द्याला धरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे.

जयपूर-

देश तीन-चार बड्या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असल्याचं राहुल गांधी यांचं हे विधान आपण अनेकदा ऐकलं आहे. जयपूरमध्ये आयोजित महागाई विरोधातील रॅलीत देखील राहुल गांधी यांनी न चुकता हे वाक्य घेतलं होतं आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. जयपूरमध्ये १२ डिसेंबर रोजी आयोजित काँग्रेसच्या रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी अदानी आणि अंबानी यांना फायदा मिळावा म्हणून केंद्र सरकार काम करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत निशाणा साधला होता. "एअरपोर्ट, कोळसा खाण, सुपर मार्केट जिथं पाहावं तिथं नुसतं केवळ दोनच लोक दिसत आहेत. अदानीजी आणि अंबानीजी", असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या याच विधानावरुन आता राजस्थानात राजकारणाला सुरुवात झाली आहे. 

राजस्थानातील काँग्रेस सरकारनं सोलर पार्कसाठी राज्यातील १६०० हेक्टर जमीन नुकतीच अदानी ग्रूपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे, याच मुद्द्याला धरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे.

राजस्थानात १५०० मेगावॅट उर्जा निर्मितीसाठीचं सोलर पार्क बनवण्यासाठी अदानी आणि राजस्थान सरकारच्या संयुक्त विद्यमानं स्थापन करण्यात आलेल्या अदानी रिन्यूएबल एनर्जी पार्क कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. याअंतर्गत जसलमैरच्या भीमसर, माधोपुरा, सदरासर गावात १३२४.१४ हेक्टर, बाटयाडू आणि नेडाण गावात २७६.८६ हेक्टर सरकारी जमीन अदानी ग्रूपला देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय ३० मेगावॅट विंड सोलर हायब्रिड पावर प्रोजेक्टसाठी अदानी ग्रूपला जसलमैरच्या केरालियाँ गावात ६४.३८ हेक्टर सरकारी जमीन भाडेतत्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

अदानी ग्रूपला देण्यात आलेल्या जमीनीवरुनच आता राजस्थानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोशल मीडियातही सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसंच राहुल गांधी यांची अदानी, अंबानींविरोधातील विधानं पण प्रत्यक्षात राजस्थान सरकारनं केलेला करार याचं उदाहरण देऊन अनेक मिम्स सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे सरकारनं सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुनच अदानी ग्रूपला जमीनीचं वाटप केल्याचा दावा सरकारनं केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAdaniअदानीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान