शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंबानी-अदानींवर एका बाजूला सडकून टीका अन् राजस्थानात काँग्रेस सरकारनंच अदानींना दिली १६०० हेक्टर जमीन; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:38 IST

राजस्थानातील काँग्रेस सरकारनं सोलर पार्कसाठी राज्यातील १६०० हेक्टर जमीन नुकतीच अदानी ग्रूपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे, याच मुद्द्याला धरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे.

जयपूर-

देश तीन-चार बड्या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असल्याचं राहुल गांधी यांचं हे विधान आपण अनेकदा ऐकलं आहे. जयपूरमध्ये आयोजित महागाई विरोधातील रॅलीत देखील राहुल गांधी यांनी न चुकता हे वाक्य घेतलं होतं आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. जयपूरमध्ये १२ डिसेंबर रोजी आयोजित काँग्रेसच्या रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी अदानी आणि अंबानी यांना फायदा मिळावा म्हणून केंद्र सरकार काम करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत निशाणा साधला होता. "एअरपोर्ट, कोळसा खाण, सुपर मार्केट जिथं पाहावं तिथं नुसतं केवळ दोनच लोक दिसत आहेत. अदानीजी आणि अंबानीजी", असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या याच विधानावरुन आता राजस्थानात राजकारणाला सुरुवात झाली आहे. 

राजस्थानातील काँग्रेस सरकारनं सोलर पार्कसाठी राज्यातील १६०० हेक्टर जमीन नुकतीच अदानी ग्रूपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे, याच मुद्द्याला धरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे.

राजस्थानात १५०० मेगावॅट उर्जा निर्मितीसाठीचं सोलर पार्क बनवण्यासाठी अदानी आणि राजस्थान सरकारच्या संयुक्त विद्यमानं स्थापन करण्यात आलेल्या अदानी रिन्यूएबल एनर्जी पार्क कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. याअंतर्गत जसलमैरच्या भीमसर, माधोपुरा, सदरासर गावात १३२४.१४ हेक्टर, बाटयाडू आणि नेडाण गावात २७६.८६ हेक्टर सरकारी जमीन अदानी ग्रूपला देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय ३० मेगावॅट विंड सोलर हायब्रिड पावर प्रोजेक्टसाठी अदानी ग्रूपला जसलमैरच्या केरालियाँ गावात ६४.३८ हेक्टर सरकारी जमीन भाडेतत्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

अदानी ग्रूपला देण्यात आलेल्या जमीनीवरुनच आता राजस्थानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोशल मीडियातही सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसंच राहुल गांधी यांची अदानी, अंबानींविरोधातील विधानं पण प्रत्यक्षात राजस्थान सरकारनं केलेला करार याचं उदाहरण देऊन अनेक मिम्स सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे सरकारनं सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुनच अदानी ग्रूपला जमीनीचं वाटप केल्याचा दावा सरकारनं केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAdaniअदानीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान