शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

अंबानी-अदानींवर एका बाजूला सडकून टीका अन् राजस्थानात काँग्रेस सरकारनंच अदानींना दिली १६०० हेक्टर जमीन; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:38 IST

राजस्थानातील काँग्रेस सरकारनं सोलर पार्कसाठी राज्यातील १६०० हेक्टर जमीन नुकतीच अदानी ग्रूपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे, याच मुद्द्याला धरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे.

जयपूर-

देश तीन-चार बड्या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असल्याचं राहुल गांधी यांचं हे विधान आपण अनेकदा ऐकलं आहे. जयपूरमध्ये आयोजित महागाई विरोधातील रॅलीत देखील राहुल गांधी यांनी न चुकता हे वाक्य घेतलं होतं आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. जयपूरमध्ये १२ डिसेंबर रोजी आयोजित काँग्रेसच्या रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी अदानी आणि अंबानी यांना फायदा मिळावा म्हणून केंद्र सरकार काम करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत निशाणा साधला होता. "एअरपोर्ट, कोळसा खाण, सुपर मार्केट जिथं पाहावं तिथं नुसतं केवळ दोनच लोक दिसत आहेत. अदानीजी आणि अंबानीजी", असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या याच विधानावरुन आता राजस्थानात राजकारणाला सुरुवात झाली आहे. 

राजस्थानातील काँग्रेस सरकारनं सोलर पार्कसाठी राज्यातील १६०० हेक्टर जमीन नुकतीच अदानी ग्रूपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे, याच मुद्द्याला धरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे.

राजस्थानात १५०० मेगावॅट उर्जा निर्मितीसाठीचं सोलर पार्क बनवण्यासाठी अदानी आणि राजस्थान सरकारच्या संयुक्त विद्यमानं स्थापन करण्यात आलेल्या अदानी रिन्यूएबल एनर्जी पार्क कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. याअंतर्गत जसलमैरच्या भीमसर, माधोपुरा, सदरासर गावात १३२४.१४ हेक्टर, बाटयाडू आणि नेडाण गावात २७६.८६ हेक्टर सरकारी जमीन अदानी ग्रूपला देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय ३० मेगावॅट विंड सोलर हायब्रिड पावर प्रोजेक्टसाठी अदानी ग्रूपला जसलमैरच्या केरालियाँ गावात ६४.३८ हेक्टर सरकारी जमीन भाडेतत्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

अदानी ग्रूपला देण्यात आलेल्या जमीनीवरुनच आता राजस्थानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोशल मीडियातही सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसंच राहुल गांधी यांची अदानी, अंबानींविरोधातील विधानं पण प्रत्यक्षात राजस्थान सरकारनं केलेला करार याचं उदाहरण देऊन अनेक मिम्स सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे सरकारनं सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुनच अदानी ग्रूपला जमीनीचं वाटप केल्याचा दावा सरकारनं केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAdaniअदानीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान