शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक, सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 15:35 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून गुरुवारी त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून गुरुवारी त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.केरळमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीवरून गुरुवारी (11 जुलै) त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. वायनाडमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. तसेच वायनाडमधील 8 हजार शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम न भरल्याचे सांगत बँकेने नोटीस पाठवली. तसेच अनेकांच्या जमिनी जप्त करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

केरळमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारने 5.5 लाख कोटी रूपयांचे मोठ्या व्यावसायिकांचे कर्ज माफ केले. सरकार अशी दुहेरी भूमिका असल्याचं राहुल यांनी म्हटलं आहे. देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आलेली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण करावी. तसेच यावेळी केरळ सरकारच्या मोरेटोरियमवर रिझर्व्ह बँकेने लक्ष घालण्याची विनंती सरकारने करावी. कर्जाच्या वसूलीसाठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवून बँकांनी त्रास देऊ नये, यावरदेखील सरकारने लक्ष द्यावे' असेही म्हटलं आहे. 

सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी सध्या देशातील शेतकऱ्यांवर जी बिकट स्थिती ओढावली आहे ती आतापासून नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी सरकार चालवले त्यांच्यामुळेच झाली असल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहे. अनेक पिकांचे हमीभाव वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यातही 6 हजार रूपये जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 

कर्नाटकात निर्माण झालेल्या या स्थितीचा विरोध करण्यासाठी गुरुवारी सकाळीकाँग्रेसने संसद परिसरात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर मोठे नेतेही सहभागी झाले होते. कर्नाटकपाठोपाठ गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरही काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस