शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

राहुल-प्रियंका भाजपाला दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत घेरणार, प्रियंका गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, २०२४ साठी काँग्रेसची रणनीती ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:26 IST

Congress: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारी करत आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये जबाबदारीचे वाटप केले आहे

नवी दिल्ली - २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारी करत आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेराहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये जबाबदारीचे वाटप केले आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे दक्षिण भारताची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर प्रियंका गांधी उत्तर भारतामध्ये पक्षाचं नेतृत्व करणार आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही उत्तर प्रदेशात पोहोचणार आहे. येथे ही यात्रा तीन दिवस चालणार आहे. या यात्रेमध्ये राहुल गांधींसोबत प्रियंका गाधीही सहभागी होणार आहेत.

प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान जोरदार प्रचार केला होता. तसेच त्याचा पक्षाला फायदा झाला होता. हिमाचलमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या विजयानंतर पक्ष पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप करण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, राहुल गांधी दक्षिण भारताची जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच ते केरळमधील वायनाड येथून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर प्रियंका गांधी ह्या उत्तर भारतामध्ये पक्षाचं नेतृत्व करतील. त्या गांधी कुटुंबीयांच्या पारंपरिक रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दक्षिण भारताची जबाबदारी सांभाळणार आहेत. याचा अर्थ हा नाही की, ते उत्तर भारतामध्ये प्रचार करणार नाहीत. राहुल गांधी हे उत्तर भारतातही प्रचार करणार आहेत. मात्र येथील प्रचाराची धुरा ही प्रियंका गांधी यांच्याकडेच असेल. पक्षातील नेत्यांच्या दाव्यानुसार पक्ष यावेळी उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित करणार आहे.

प्रियंका गांधी यांच्या पीआर टीममधील सदस्यांच्या दाव्यानुसार राहुल गांधी आता दक्षिण भारतामध्ये आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशसह पूर्ण उत्तरेतील नेतृत्वा सांभाळणार आहेत. प्रियंका गांधी लखनौ आणि दिल्लीमधून राहताना भारतीय जनता पक्षाची रणनीती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फारसा फायदा झाला नव्हता. मात्र प्रियंका गांधी यांनी पक्षाला यश मिळून देण्यासाठी खूप मेहनत केली होती.   

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा