शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

'विरोधक म्हणून राहुल गांधींचं काम चांगलंय, अजून 5 ते 10 वर्षे त्यांना तेच करायचंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 8:17 PM

राहुल गांधी विरोधक म्हणून चांगल काम करत आहेत, त्यांना अजून पुढील 5 ते 10 वर्षे विरोधकाचे काम करायचे आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. 

नवी दिल्ली - लोकमत पार्लमिंटरी अवॉर्ड सोहळ्यातील 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह' सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस देशातील पाच राज्यांच्या निकालाबात स्पष्टीकरण दिले. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वार खोचक टोला लगावला. राहुल गांधी विरोधक म्हणून चांगल काम करत आहेत, त्यांना अजून पुढील 5 ते 10 वर्षे विरोधकाचे काम करायचे आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकूणच भाजपाला धडा शिकवणारा आहे, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, असं म्हटलं जातंय. परंतु, हे निकाल म्हणजे भाजपाचा मोठा पराभव आहे, हे मानायलाच भाजपाचे नेते तयार नसल्याचे संकेत आज मिळाले. 'लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड' सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये आधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकड्यांचा खेळ करून पराभवाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेत राहुल गांधींच्या नेतृत्वावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. मोदी सरकारविरोधात देशात महाआघाडी होणार आहे, त्याबाबत फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, महाआघाडीचा काहीही परिमाण होणार नाही. 

तसेच राहुल गांधींचे अभिनंदन, त्यांना मोठं यश मिळाल आहे. पम, हा भाजपा मोठा पराभव नाही. देशात विरोधी पक्ष शक्तिशाली असावा अशी आमची भावना आहे. राहुल गांधी विरोधक म्हणून चांगल काम करत आहेत. पुढील 5 ते 10 वर्षे त्यांना आणखी विरोधक म्हणून काम करायचं आहे, असा खोचक टोलाही फडणवीस यांनी लगावला. तर राम मंदिराबाबत बोलतानाही फडणवीस यांनी मंदिर बनवणे हा आमचा संकल्प आहे, पण तो निवडणुकीचा मुद्दा नाही. राज्यसभेत राहुल गांधींनी आम्हाला साथ दिल्यास याबाबतचा कायदा नक्कीच अमलात येईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीLokmat Parliamentary Awards 2018लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८