शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

...20 सेकंदांचा विलंब झाला असता तर राहुल गांधींचं विमान कोसळलं असतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 10:12 IST

परिस्थिती नियंत्रणात आल्यानं मोठा अनर्थ टळला

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी जाताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यावेळी वैमानिकानं परिस्थिती नियंत्रणात आणली नसती, तर अवघ्या काही सेकंदात राहुल गांधींचंविमान कोसळलं असतं, अशी माहिती नागरी उड्डाण संचलनालयाच्या (डीजीसीए) अहवालातून समोर आली आहे. त्यावेळी राहुल गांधींच्या विमानानं इमर्जन्सी लँडिंग केलं होतं. त्यावेळी वैमानिकानं प्रसंगावधान राखलं नसतं, तर मोठा अनर्थ घडला असता. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता होती. मात्र वैमानिकानं प्रयत्नांची शर्थ करुन परिस्थिती हाताळली. अन्यथा पुढच्या काही सेकंदांमध्ये राहुल यांचं विमान कोसळलं असतं, असं डीजीसीएनं अहवालात म्हटलं आहे. राहुल गांधी कर्नाटकमध्ये प्रचारासाठी जात असताना अचानक त्यांचं विमान एका बाजूला झुकलं. त्यातून आवाज येऊ लागला आणि विमान ऑटो पायलट मोडवर गेलं. राहुल गांधींच्या विमानात झालेला बिघाड ही तांत्रिक समस्या नसून तो मोठा कट असल्याची टीका त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली होती. राहुल यांच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडेही केली होती. यानंतर हवाई उड्डाण क्षेत्रातील नियंत्रक संस्था असलेल्या नागरी उड्डाण संचलनालयानं (डीजीसीए) यासाठी दोन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीनं आपला अहवाल डीजीसीएला दिला. 'कदाचित वैमानिकाच्या चुकीमुळे तसं घडलं असेल. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं ते एका बाजूला झुकलं आणि जमिनीवर कोसळण्याच्या स्थितीत होतं. त्यामुळे विमानातून आवाज येऊ लागला. या प्रकरणात डीजीसीएकडून विमानातील डेटा रेकॉर्ड आणि कॉकपिट सिस्टिमची तपासणी करण्यात आली,' अशी माहिती डीजीसीएच्या एका अधिकाऱ्यानं दिली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसairplaneविमानKarnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८