शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राहुल गांधी यांची नवी रणनीती; विजयश्री खेचण्यासाठी युती जास्त, जागा कमी, काँग्रेस लढवणार ३०० जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 06:28 IST

पक्षाने भलेही २०१९ मध्ये ४२३ किंवा २०१४ मध्ये ४६४ जागा लढवल्या असतील. मात्र, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा टक्के जागाही पक्षाला मिळवता आल्या नव्हत्या.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३०० जागा लढवणार आहे. एखादवेळी ३०० पेक्षाही कमी जागा लढवू शकते, असे संकेत पक्षाच्या ‘वॉर रूम’मधून मिळत आहेत.

पक्षाने भलेही २०१९ मध्ये ४२३ किंवा २०१४ मध्ये ४६४ जागा लढवल्या असतील. मात्र, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा टक्के जागाही पक्षाला मिळवता आल्या नव्हत्या. त्यामुळे पक्षनेते राहुल गांधी यांनी रणनीती बदलली असून, अधिक जागा जिंकण्यासाठी अधिकाधिक पक्षांसोबत युती आणि त्यांना अधिक जागा सोडण्याचे धोरण आता अवलंबण्यात आल्याचे सांगण्यात येते.

महाराष्ट्रातही कमी जागांवर समाधान - महाराष्ट्रात यावेळी अधिक जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना जास्त जागा देण्याचे पक्षाने ठरवले आहे. तामिळनाडू, बिहार, केरळ व झारखंडमध्येही पक्षाने समविचारी पक्षांसोबत युती केली आहे.

- आंध्र प्रदेश व ओडिशा यांसारख्या काही राज्यांत काँग्रेसची स्थिती ठीक नाही, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड या भाजपशी थेट मुकाबला असलेल्या राज्यांत तसेच ईशान्येत आसाम वगळता अन्य राज्यांत तुल्यबळ लढा देण्यासाठी काँग्रेससमोर अडथळ्यांची शर्यत आहे. मात्र, सत्तेत असलेल्या तेलंगणा आणि कर्नाटकात आपल्या खासदारांची संख्या वाढण्याची पक्षाला आशा आहे.

- महाराष्ट्रात काँग्रेसने २०१९ मध्ये २५ जागा लढवल्या होत्या. - उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० पैकी १७ जागा लढविण्याचा विचार.

कुठे होणार जागा कमी? २०१९ मध्ये काँग्रेसने उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० पैकी ६७ जागा लढवल्या. मात्र, एकाच जागेवर यश मिळाले. त्यामुळे यावेळी तेथे केवळ १७ जागा लढवून विजयी जागांची संख्या किमान ५ पर्यंत नेऊ शकण्याची पक्षाला आशा आहे. 

२०१९ मध्ये काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये ४० जागा लढवल्या होत्या. परंतु, केवळ दोनच जागा जिंकता आल्या. यावेळी पक्ष बंगालमधील केवळ त्या जागांवर उमेदवार देणार आहे जेथे विजयाची खात्री वाटते. त्याचबरोबर तेथे तृृणमूल काँग्रेससोबत जरी युती नाही झाली तरी ऐनवेळी काहीतरी तडजोड होईल, अशी पक्षाला आशा आहे. 

‘आप’सोबत युती करण्यासाठी काँग्रेसने हरयाणा, दिल्ली व गुजरातमध्ये ‘आप’ला जागा दिल्याने एप्रिलमध्ये पंजाबमध्येही दोन्ही पक्षांत जागांबाबत तडजोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र