शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"तेव्हा २६ तासांत राहुल गांधींची खासदारकी काढली, आता ७२ तास झाले, तरीही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 13:15 IST

तसेच, लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली - मोदी आडनाव प्रकरणात काँग्रेस नेते आणि खासदारराहुल गांधींना गुजरात हायकोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वांत मोठा दिलासा मानला जात आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे राहुल गांधींना खासदारकीही परत मिळणार आहे. मात्र, सर्वोच्च निकालाच्या ७२ तासानंतरही त्यांना खासदारकी परत देण्यात आली नसल्यावरुन शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच, लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. 

राहुल गांधीना सरकार घाबरत आहे. कारण, सूरत न्यायालयाने राहुल गांधींविरुद्ध निर्णय दिल्यानंतर अवघ्या २६ तासांतच राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. त्यांना संसदेतून बेदखल करण्यात आलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आता याप्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे, राहुल गांधींची खासदारकी त्यांना परत मिळणार आहे. मात्र, यासंदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आता ७२ तास उलटून गेले आहेत, तरीही त्यांना खासदारकी परत का मिळाली नाही? असा सवालही शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. 

संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. लोकसभा अध्यक्ष म्हणतात की, याबाबत आम्ही अभ्यास करुन निर्णय घेऊ, मग सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर अभ्यास केला होता का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच, उद्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याला सुरुवात होत आहे. या आठवड्यात मणीपूर हिंसाचार, अविश्वास प्रस्ताव आणि देशातील गंभीर विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळेच, या चर्चेत राहुल गांधींना सहभागी होता येऊ नये म्हणून राहुल गांधींना अद्यापही खासदारकी देण्यात आली नसल्याचं गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. तसेच, हे सरकार राहुल गांधींना घाबरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मानहानीचा दावा करणारे मोदी म्हणतात

राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा करणाऱ्या पूर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, मात्र सत्र न्यायालयात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहणार आहे. राहुल गांधी यांनी  २०१९ मध्ये कर्नाटकातील कोलारमधील निवडणूकीच्या रॅलीमध्ये संपूर्ण मोदी जातीचा अपमान केला होता. त्यामुळे आमची लढाई या अपमानाविरोधात आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीMember of parliamentखासदारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय