शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

"तेव्हा २६ तासांत राहुल गांधींची खासदारकी काढली, आता ७२ तास झाले, तरीही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 13:15 IST

तसेच, लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली - मोदी आडनाव प्रकरणात काँग्रेस नेते आणि खासदारराहुल गांधींना गुजरात हायकोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वांत मोठा दिलासा मानला जात आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे राहुल गांधींना खासदारकीही परत मिळणार आहे. मात्र, सर्वोच्च निकालाच्या ७२ तासानंतरही त्यांना खासदारकी परत देण्यात आली नसल्यावरुन शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच, लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. 

राहुल गांधीना सरकार घाबरत आहे. कारण, सूरत न्यायालयाने राहुल गांधींविरुद्ध निर्णय दिल्यानंतर अवघ्या २६ तासांतच राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. त्यांना संसदेतून बेदखल करण्यात आलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आता याप्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे, राहुल गांधींची खासदारकी त्यांना परत मिळणार आहे. मात्र, यासंदर्भात अद्यापही निर्णय झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आता ७२ तास उलटून गेले आहेत, तरीही त्यांना खासदारकी परत का मिळाली नाही? असा सवालही शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. 

संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. लोकसभा अध्यक्ष म्हणतात की, याबाबत आम्ही अभ्यास करुन निर्णय घेऊ, मग सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर अभ्यास केला होता का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच, उद्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याला सुरुवात होत आहे. या आठवड्यात मणीपूर हिंसाचार, अविश्वास प्रस्ताव आणि देशातील गंभीर विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळेच, या चर्चेत राहुल गांधींना सहभागी होता येऊ नये म्हणून राहुल गांधींना अद्यापही खासदारकी देण्यात आली नसल्याचं गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. तसेच, हे सरकार राहुल गांधींना घाबरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मानहानीचा दावा करणारे मोदी म्हणतात

राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा करणाऱ्या पूर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, मात्र सत्र न्यायालयात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहणार आहे. राहुल गांधी यांनी  २०१९ मध्ये कर्नाटकातील कोलारमधील निवडणूकीच्या रॅलीमध्ये संपूर्ण मोदी जातीचा अपमान केला होता. त्यामुळे आमची लढाई या अपमानाविरोधात आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीMember of parliamentखासदारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय