शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींची गुजरात निवडणुकीत एंट्री; बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्याला घातला हात, कर्जमाफीवरून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 06:15 IST

राहुल गांधी म्हणाले, लाखो रुपये शिक्षणावर खर्च करूनही रोजगार मिळत नाही. इंजिनीअर, डॉक्टर बनायचे होते. त्यासाठी खर्च केला; पण आज गाडी चालवावी लागत आहे. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा देशात व गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

कमलेश वानखेडे -

राजकोट : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवून गुजरातमध्ये दाखल होत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारी व महागाईचे कार्ड खेळत युवक, मध्यमवर्गीयांसह लघुउद्योजकांना साद घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा थेट उल्लेख करणे टाळत जनतेच्या मनातील मुद्द्यांना हात घालण्यावर त्यांनी अधिक भर दिला.

सोमवारी सायंकाळी राहुल गांधी यांनी राजकोटच्या शास्त्री मैदानावर प्रचार सभा झाली. राहुल गांधी म्हणाले, लाखो रुपये शिक्षणावर खर्च करूनही रोजगार मिळत नाही. इंजिनीअर, डॉक्टर बनायचे होते. त्यासाठी खर्च केला; पण आज गाडी चालवावी लागत आहे. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा देशात व गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

गुजरात लघु व मध्यम उद्योगांचे केंद्र आहे. संपूर्ण देश तुम्ही चालविता. तुम्ही खरे रोजगार देता. पण सरकारने नोटबंदी केली. सर्व लघु व मध्यम उद्योग बंद झाले. चुकीची जीएसटी लागू केली. त्यामुळे जे वाचले होते तेही संपले. अरबपतींसाठी यांना रस्ता साफ करायचा होता. तीन-चार उद्योगपतींचे लाखो-कोटींचे कर्ज माफ होेते; पण शेतकरी एक लाखाचे कर्ज घेतो ते माफ का होत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.     - राहुल गांधी

यात्रा गुजरातमधून न निघाल्याचे दु:ख - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमधून जात नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. राजकोटच्या सभेत राहुल यांनी या मुद्द्याला हात घालत ही यात्रा गुजरातमधून न निघाल्याचे दु:ख असल्याचे सांगितले. पण सोबतच भारत जोडो सुरू करण्यामागे महात्मा गांधींचा, गुजरातचा विचार आहे. - हा रस्ता गांधी, सरदार पटेल यांनी दाखविला होता, असे सांगत त्यांनी गुजरातला क्रेडिट दिले. मी दोन हजार किलोमीटर चाललो ही काही मोठी गोष्ट नाही. लॉकडाऊनमध्ये या देशातील मजूर उपाशीपोटी हजारो किलोमीटर चालले. त्या संकटकाळात गुजरात सरकारने मदत केली नाही. उलट त्याचवेळी देशातील श्रीमंत उद्योगपतींचे कर्ज माफ केले, अशी टीका करीत आम्हाला न्याय करणारा भारत हवा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसींच्या जिवात जीव आलानिवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त होते. गुजरातची पहिल्या टप्प्यातील निवडणूक दहा दिवसांवर येऊन ठेपली असतानाही राहुल यांची एकही जाहीर सभा झाली नव्हती. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते चिंतित होते. पण राजकोटच्या सभेने काँग्रेसींच्या जिवात जीव आला. राहुल गांधी यांच्या सभेने मिळालेल्या बूस्टरमुळे पुढचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास स्थानिक काँग्रेस नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा