शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

राहुल गांधींची गुजरात निवडणुकीत एंट्री; बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्याला घातला हात, कर्जमाफीवरून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 06:15 IST

राहुल गांधी म्हणाले, लाखो रुपये शिक्षणावर खर्च करूनही रोजगार मिळत नाही. इंजिनीअर, डॉक्टर बनायचे होते. त्यासाठी खर्च केला; पण आज गाडी चालवावी लागत आहे. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा देशात व गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

कमलेश वानखेडे -

राजकोट : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवून गुजरातमध्ये दाखल होत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारी व महागाईचे कार्ड खेळत युवक, मध्यमवर्गीयांसह लघुउद्योजकांना साद घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा थेट उल्लेख करणे टाळत जनतेच्या मनातील मुद्द्यांना हात घालण्यावर त्यांनी अधिक भर दिला.

सोमवारी सायंकाळी राहुल गांधी यांनी राजकोटच्या शास्त्री मैदानावर प्रचार सभा झाली. राहुल गांधी म्हणाले, लाखो रुपये शिक्षणावर खर्च करूनही रोजगार मिळत नाही. इंजिनीअर, डॉक्टर बनायचे होते. त्यासाठी खर्च केला; पण आज गाडी चालवावी लागत आहे. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा देशात व गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

गुजरात लघु व मध्यम उद्योगांचे केंद्र आहे. संपूर्ण देश तुम्ही चालविता. तुम्ही खरे रोजगार देता. पण सरकारने नोटबंदी केली. सर्व लघु व मध्यम उद्योग बंद झाले. चुकीची जीएसटी लागू केली. त्यामुळे जे वाचले होते तेही संपले. अरबपतींसाठी यांना रस्ता साफ करायचा होता. तीन-चार उद्योगपतींचे लाखो-कोटींचे कर्ज माफ होेते; पण शेतकरी एक लाखाचे कर्ज घेतो ते माफ का होत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.     - राहुल गांधी

यात्रा गुजरातमधून न निघाल्याचे दु:ख - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमधून जात नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. राजकोटच्या सभेत राहुल यांनी या मुद्द्याला हात घालत ही यात्रा गुजरातमधून न निघाल्याचे दु:ख असल्याचे सांगितले. पण सोबतच भारत जोडो सुरू करण्यामागे महात्मा गांधींचा, गुजरातचा विचार आहे. - हा रस्ता गांधी, सरदार पटेल यांनी दाखविला होता, असे सांगत त्यांनी गुजरातला क्रेडिट दिले. मी दोन हजार किलोमीटर चाललो ही काही मोठी गोष्ट नाही. लॉकडाऊनमध्ये या देशातील मजूर उपाशीपोटी हजारो किलोमीटर चालले. त्या संकटकाळात गुजरात सरकारने मदत केली नाही. उलट त्याचवेळी देशातील श्रीमंत उद्योगपतींचे कर्ज माफ केले, अशी टीका करीत आम्हाला न्याय करणारा भारत हवा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसींच्या जिवात जीव आलानिवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त होते. गुजरातची पहिल्या टप्प्यातील निवडणूक दहा दिवसांवर येऊन ठेपली असतानाही राहुल यांची एकही जाहीर सभा झाली नव्हती. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते चिंतित होते. पण राजकोटच्या सभेने काँग्रेसींच्या जिवात जीव आला. राहुल गांधी यांच्या सभेने मिळालेल्या बूस्टरमुळे पुढचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास स्थानिक काँग्रेस नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा