शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

लालकृष्ण अडवाणींना जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवले, राहुल गांधींची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 18:31 IST

भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

चंद्रपूर - भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सध्याच्या भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र मोदींनी त्यांना डावलले. लालकृष्ण अडवाणी यांना अपमानित करून जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवण्यात आले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेतृत्वाकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांना वाढत्या वयाचे कारण देऊन उमेदवारी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवाली ब्लॉग लिहून पक्षातील सध्याच्या घडामोडींविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्याचा धागा पकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. '' हिंदू धर्मात गुरुचे स्थान फार मोठे असते. मात्र नरेंद्र  मोदींना आपल्या गुरुलाच डावलले आहे आणि आता ते आम्हाल हिंदू धर्म शिकवू पाहत आहेत.'' असे राहुल गांधी म्हणाले.''मोदींच्या काळात लालकृष्ण अडवाणी यांना भाजपामध्ये अपमानित करण्यात  आले. त्यांना जोडे मारून स्टेजवरून उतरवण्यात आले .'' असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, मोदींच्या  आर्थिक धोरणांवरही राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. मोदींनी ५ वर्षात देशातील १५ लोकांना लाखो कोटी रुपये दिले मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना माफी दिली नाही. मला सांगा, शेतकरी किंवा मजुराच्या घरासमोर चौकीदार असतो काय? तर तो नसतो. तो असतो कोट्यवधी रुपये ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या घरासमोर. पुलवामा हल्ल्याच्या दिवशी मोदींनी अदानीला ६ विमानतळ दिले. या मोदींनी फक्त श्रीमंतांचीच चौकीदार केली आहे, असे घणाघाती आरोप करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेसला निवडून देण्याचे व स्थिर सरकार आणण्याचे आवाहन येथील मतदारांना केले.देशात पैशाची कमी नाही. जनतेला संभ्रमित केले जात आहे. शेतकरी आणि मजुरांना देण्यासाठी पैशाची कमी आहे पण अंबानींसाठी ती कमी नाही. गरीबांना देत नसाल तर मग उद्योगपतींनाही पैसे देऊ नका. मेक इन इंडिया म्हटले पण देशात व्यापार ठप्प झाला आहे. सगळा चायना माल येथे येतो आहे. नोटबंदीला १२ वर्षांच्या मुलानेही नकार दिला असता. पण ती गोष्ट मोदींना कळली नाही. महागाई वाढते आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही निवडणुकांनंतर ट्रॅक्स प्रणाली सरळ करू. शेतकºयांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करू असे आश्वासन राहूल गांधी यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019chandrapur-pcचंद्रपूरcongressकाँग्रेसBJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी