शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

लालकृष्ण अडवाणींना जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवले, राहुल गांधींची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 18:31 IST

भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

चंद्रपूर - भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. सध्याच्या भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र मोदींनी त्यांना डावलले. लालकृष्ण अडवाणी यांना अपमानित करून जोडे मारून भाजपाच्या स्टेजवरून उतरवण्यात आले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेतृत्वाकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांना वाढत्या वयाचे कारण देऊन उमेदवारी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी गुरुवाली ब्लॉग लिहून पक्षातील सध्याच्या घडामोडींविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्याचा धागा पकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. '' हिंदू धर्मात गुरुचे स्थान फार मोठे असते. मात्र नरेंद्र  मोदींना आपल्या गुरुलाच डावलले आहे आणि आता ते आम्हाल हिंदू धर्म शिकवू पाहत आहेत.'' असे राहुल गांधी म्हणाले.''मोदींच्या काळात लालकृष्ण अडवाणी यांना भाजपामध्ये अपमानित करण्यात  आले. त्यांना जोडे मारून स्टेजवरून उतरवण्यात आले .'' असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, मोदींच्या  आर्थिक धोरणांवरही राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. मोदींनी ५ वर्षात देशातील १५ लोकांना लाखो कोटी रुपये दिले मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना माफी दिली नाही. मला सांगा, शेतकरी किंवा मजुराच्या घरासमोर चौकीदार असतो काय? तर तो नसतो. तो असतो कोट्यवधी रुपये ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या घरासमोर. पुलवामा हल्ल्याच्या दिवशी मोदींनी अदानीला ६ विमानतळ दिले. या मोदींनी फक्त श्रीमंतांचीच चौकीदार केली आहे, असे घणाघाती आरोप करीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेसला निवडून देण्याचे व स्थिर सरकार आणण्याचे आवाहन येथील मतदारांना केले.देशात पैशाची कमी नाही. जनतेला संभ्रमित केले जात आहे. शेतकरी आणि मजुरांना देण्यासाठी पैशाची कमी आहे पण अंबानींसाठी ती कमी नाही. गरीबांना देत नसाल तर मग उद्योगपतींनाही पैसे देऊ नका. मेक इन इंडिया म्हटले पण देशात व्यापार ठप्प झाला आहे. सगळा चायना माल येथे येतो आहे. नोटबंदीला १२ वर्षांच्या मुलानेही नकार दिला असता. पण ती गोष्ट मोदींना कळली नाही. महागाई वाढते आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही निवडणुकांनंतर ट्रॅक्स प्रणाली सरळ करू. शेतकºयांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करू असे आश्वासन राहूल गांधी यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019chandrapur-pcचंद्रपूरcongressकाँग्रेसBJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी