शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

Rahul Gandhi: "भारतात मुस्लिमांसोबत जे घडतंय ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडलं होतं’’, अमेरिकेतून राहुल गांधींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 17:11 IST

Rahul Gandhi: सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले की, आज भारतामध्ये मुस्लिमांसोबत जे काही घडत आहे, ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडत होतं.

सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले की, आज भारतामध्ये मुस्लिमांसोबत जे काही घडत आहे, ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडत होतं. या विरोधात प्रेमानं लढावं लागेल. सॅन फ्रान्सिस्को येथे मोहब्बक की दुकान या कार्यक्रमात बे एरिया मुस्लिम कम्युनिटीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी आरोप केला की, भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काही कामाचा प्रभाव अल्पसंख्याक आणि दलित, आदिवासी समुदायाच्या लोकांना जाणवत आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मुस्लिमांना हा प्रभाव प्रत्यक्षपणे जाणवत आहे. कारण ही गोष्ट त्यांच्यासोबत अधिक प्रमाणात घडत आहे. मात्र वास्तवात हे सर्व समुदायांसोबत घडत आहे. ज्याप्रकारे मुस्लिम स्वत:वरील हल्ला अनुभवत आहेत. मी हमखास सांगतो की, शीख, ख्रिश्चन, दलित आणि आदिवासीसुद्धा अशा प्रकारचा हल्ला अनुभवत आहेत. तुम्ही द्वेशाला द्वेशाने संपवू शकत नाही तर प्रेम आणि स्नेहाने संपवू शकता. जर तु्म्ही ८० च्या दशकात उत्तर प्रदेशात गेला असाल तर तेव्हा अशा घटना दलितांसोबत घडत होत्या, हे आपणास माहित असेल. आपण याला आव्हान दिलं पाहिजे. त्याविरोधात लढलं पाहिजे. तसेच हा लढा द्वेशाने नव्हे तर प्रेमाने दिला पाहिजे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसच्या भारत आणि जगभरातील लोकशाही मूल्यांबाबत कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी आणि अनिवासी भारतीयांसोबत संवाद साधण्यासाठी अमेरिकेच्या सहा दिवसीय दौऱ्यावर आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आर्थिक असमानतेबाबत भाष्य केलं. तिथे त्यांनी सांगितलं की, काही लोकांना उदरनिर्वाह चालवणं कठीण आहे. तर काही जणांकडे लाखो कोटी रुपये आहेत. यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारदरम्यान करण्यात आलेली जातिनिहाय जनगणना, मनरेगा आणि काँग्रेसकडून प्रस्थावित न्याय योजनेबाबतही भाष्य केलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार