शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: "भारतात मुस्लिमांसोबत जे घडतंय ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडलं होतं’’, अमेरिकेतून राहुल गांधींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 17:11 IST

Rahul Gandhi: सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले की, आज भारतामध्ये मुस्लिमांसोबत जे काही घडत आहे, ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडत होतं.

सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को येथे एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले की, आज भारतामध्ये मुस्लिमांसोबत जे काही घडत आहे, ते १९८० च्या दशकात दलितांसोबत घडत होतं. या विरोधात प्रेमानं लढावं लागेल. सॅन फ्रान्सिस्को येथे मोहब्बक की दुकान या कार्यक्रमात बे एरिया मुस्लिम कम्युनिटीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी आरोप केला की, भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काही कामाचा प्रभाव अल्पसंख्याक आणि दलित, आदिवासी समुदायाच्या लोकांना जाणवत आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मुस्लिमांना हा प्रभाव प्रत्यक्षपणे जाणवत आहे. कारण ही गोष्ट त्यांच्यासोबत अधिक प्रमाणात घडत आहे. मात्र वास्तवात हे सर्व समुदायांसोबत घडत आहे. ज्याप्रकारे मुस्लिम स्वत:वरील हल्ला अनुभवत आहेत. मी हमखास सांगतो की, शीख, ख्रिश्चन, दलित आणि आदिवासीसुद्धा अशा प्रकारचा हल्ला अनुभवत आहेत. तुम्ही द्वेशाला द्वेशाने संपवू शकत नाही तर प्रेम आणि स्नेहाने संपवू शकता. जर तु्म्ही ८० च्या दशकात उत्तर प्रदेशात गेला असाल तर तेव्हा अशा घटना दलितांसोबत घडत होत्या, हे आपणास माहित असेल. आपण याला आव्हान दिलं पाहिजे. त्याविरोधात लढलं पाहिजे. तसेच हा लढा द्वेशाने नव्हे तर प्रेमाने दिला पाहिजे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसच्या भारत आणि जगभरातील लोकशाही मूल्यांबाबत कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी आणि अनिवासी भारतीयांसोबत संवाद साधण्यासाठी अमेरिकेच्या सहा दिवसीय दौऱ्यावर आहेत. सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आर्थिक असमानतेबाबत भाष्य केलं. तिथे त्यांनी सांगितलं की, काही लोकांना उदरनिर्वाह चालवणं कठीण आहे. तर काही जणांकडे लाखो कोटी रुपये आहेत. यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारदरम्यान करण्यात आलेली जातिनिहाय जनगणना, मनरेगा आणि काँग्रेसकडून प्रस्थावित न्याय योजनेबाबतही भाष्य केलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार