शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'व्होटचोरी' रॅलीत राहुल गांधी यांचा इशारा, निवडणूक आयोगाला वाचवणारा नवा कायदा बदलू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:32 IST

निवडणूक आयोग सरकारसाठी काम करतो, सत्तेवर आल्यावर कारवाई!

नवी दिल्ली: रामलीला मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या 'व्होट चोरी - गद्दी छोड' रॅलीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत मुख्य निवडणूक आयोग आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांची नावे घेतली. हे अधिकारी भाजपसाठी काम करत असून, सत्यासाठी आग्रही राहू, भाजप व संघपरिवाराच्या सत्तेला पराभूत करू, असे राहुल गांधी म्हणाले.

भाजप व संघ परिवाराकडे सत्ता आहे. त्यामुळे ते मत चोरी करू शकतात. भाजपने बिहार निवडणुकांत १० हजार रुपये मतदारांना वाटले; पण निवडणूक आयोगाने या पक्षाला कोणतेही कारण विचारले नाही. हा निवडणूक आयोग पंतप्रधानांसाठी काम करतो. पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाला वाचवण्यासाठी नवा कायदा आणला आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर हा कायदा बदलू आणि या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही सत्य व अहिसेंवर ठाम राहू व केंद्रातील सत्तेचा पराभव करू, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला. भाजप, संघपरिवार राज्य घटनेला उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका करत खर्गे यांनी त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे सांगितले.

भाजपला सत्तेवरून हद्दपार केले पाहिजेत, खगैंची टीका

रॅलीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला केला. मत चोरी करणारे भाजप गद्दार असून घटनेने दिलेला मताचा अधिकार वाचवण्यासाठी या सरकारला सत्तेवरून हाकलून दिले पाहिजे, असे खर्गे यांनी आवाहन केले.

काँग्रेसने अनेक निवडणुका हरल्या असल्या तरी काँग्रेसचा विचार देशात अद्याप जिवंत आहे. गोळवलकर, मोहन भागवत यांची विचारसरणी आणि मनुस्मृतीतील विचार देशाला उद्ध्वस्त करत असून या देशाला फक्त काँग्रेसची विचारसरणीच वाचवू शकते असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.

मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्यास भाजप जिंकूच शकत नाही : प्रियंका

'व्होट चोरी..'च्या रॅलीत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी देशातील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली. जर देशात प्रामाणिकपणे निवडणुका व त्याही मतपत्रिकेवर घेतल्या तर भाजप कधीही निवडून येऊ शकत नाहीत, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. भाजपचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे.

केवळ निवडणूक आयोगामुळे निवडून येत आहेत. उत्तर प्रदेशांत तीन कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. बिहारमध्ये ६५ लाख मतदारांची नावे वगळून आचार संहिता असतानाही मतदारांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करून मते चोरण्यात आली. या निवडणुकांचे निकाल संशयास्पद आहेत.

मत चोरीला मदत करणाऱ्या तीन निवडणूक आयुक्तांची नावे विसरू नका, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

काँग्रेस आमदाराने वाचवले प्राण

बेंगळूरु : गोव्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात एका अमेरिकन महिला सहप्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कर्नाटकच्या माजी आमदार आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अंजली निंबाळकर यांनी त्वरित वैद्यकीय मदत पुरवून तिचे प्राण वाचवले.

एआयसीसीच्या सचिव तथा गोवा, दमण-दीव व दादरा नगर हवेलीच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर काँग्रेसने आयोजित केलेल्या 'वोट चोरी' रॅलीत सहभागी होण्यासाठी प्रवास करत होत्या. 

त्यावेळी एक अमेरिकन महिला सहप्रवासी बेशुद्ध पडली. ही वैद्यकीय आणीबाणी लक्षात येताच डॉ. निंबाळकर यांनी तत्काळ धाव घेतली आणि उपचार करत प्राण वाचवले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Warns of Vote Rigging, Promises to Change Election Law

Web Summary : Rahul Gandhi alleged election commission bias at a rally, vowing to overturn laws favoring BJP. Kharge criticized BJP for undermining the constitution. Priyanka Gandhi demanded ballot elections. A Congress MLA saved a passenger's life on a flight to the rally.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस