शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'मी दोन मुद्दे उपस्थित केले आणि संपूर्ण मीडिया माझ्याविरोधात गेला' - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 18:30 IST

'मीडिया 24 तास माझ्यासाठी वाह-वाह करायचा. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपने हजारो कोटी खर्च केले.'

Rahul Gandhi: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान राहुल गांधींनी (Rahul Gandhi) राजकारणातील सुरुवातीचे दिवस आठवले. जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा सुरुवातीची 5-6 वर्षे देशातील प्रसारमाध्यमे त्यांची खूप प्रशंसा करत होते. परंतु त्यानंतर सर्वकाही बदलले, अशी भावना राहुल यांनी व्यक्त केली. 'माझ्या मीडिया इमेजचे सत्य काय?', या कॅप्शनसह राहुल गांधींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी भाजपवर आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप केला.

हे दोन मुद्दे उपस्थित केलेव्हिडिओमध्ये राहुल म्हणाले, “मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा 2008-09 पर्यंत देशातील संपूर्ण मीडिया माझ्यासाठी 24 तास 'वाह, वाह' करायचे. मग मी नियामगिरी आणि भट्टा-परसौल, हे दोन मुद्दे मांडले आणि सर्व काही बदलले. मी जमिनीचा मुद्दा उचलून धरला आणि गरीब लोकांचे रक्षण करू लागलो, तेव्हा संपूर्ण मीडियाने माझ्या विरोधात जाऊन तमाशा सुरू केला," अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

माझी प्रतिमा डागाळण्याचे काम भाजपचेते पुढे म्हणाले, "आम्ही आदिवासींसाठी पेसा कायदा आणला आणि त्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी इतर कायदेही आणले. त्यानंतर मीडियाने 24 तास माझ्या विरोधात लिहायला सुरुवात केली. भारताची संपत्ती(राजे महाराजांची संपत्ती) होती ती राज्यघटनेच्या माध्यमातून जनतेला देण्यात आली होती, पण भाजप याच्या उलट करत आहे. तीच संपत्ती ते 'महाराजांना' परत देत आहेत. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले,' असा आरोपही राहुल यांनी केला.

ते दोन मुद्दे कोणते?ओडिशातील वेदांताच्या खाणकामासाठी नियामगिरीच्या भूसंपादनाला राहुल गांधींनी विरोध केला होता. त्यांनी ते बेकायदेशीर म्हटले आणि नंतर ते बंद केले. 2011 मध्ये उत्तर प्रदेशातील भट्टा, परसौल येथे भूसंपादनावरून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा विरोध दिसून आला. तत्कालीन मायावती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी भेट दिली होती आणि राहुल गांधींच्या राजकारणातील प्रवासातील हा एक लोकप्रिय प्रसंग होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा