शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'मी दोन मुद्दे उपस्थित केले आणि संपूर्ण मीडिया माझ्याविरोधात गेला' - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 18:30 IST

'मीडिया 24 तास माझ्यासाठी वाह-वाह करायचा. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपने हजारो कोटी खर्च केले.'

Rahul Gandhi: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान राहुल गांधींनी (Rahul Gandhi) राजकारणातील सुरुवातीचे दिवस आठवले. जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा सुरुवातीची 5-6 वर्षे देशातील प्रसारमाध्यमे त्यांची खूप प्रशंसा करत होते. परंतु त्यानंतर सर्वकाही बदलले, अशी भावना राहुल यांनी व्यक्त केली. 'माझ्या मीडिया इमेजचे सत्य काय?', या कॅप्शनसह राहुल गांधींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी भाजपवर आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप केला.

हे दोन मुद्दे उपस्थित केलेव्हिडिओमध्ये राहुल म्हणाले, “मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा 2008-09 पर्यंत देशातील संपूर्ण मीडिया माझ्यासाठी 24 तास 'वाह, वाह' करायचे. मग मी नियामगिरी आणि भट्टा-परसौल, हे दोन मुद्दे मांडले आणि सर्व काही बदलले. मी जमिनीचा मुद्दा उचलून धरला आणि गरीब लोकांचे रक्षण करू लागलो, तेव्हा संपूर्ण मीडियाने माझ्या विरोधात जाऊन तमाशा सुरू केला," अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

माझी प्रतिमा डागाळण्याचे काम भाजपचेते पुढे म्हणाले, "आम्ही आदिवासींसाठी पेसा कायदा आणला आणि त्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी इतर कायदेही आणले. त्यानंतर मीडियाने 24 तास माझ्या विरोधात लिहायला सुरुवात केली. भारताची संपत्ती(राजे महाराजांची संपत्ती) होती ती राज्यघटनेच्या माध्यमातून जनतेला देण्यात आली होती, पण भाजप याच्या उलट करत आहे. तीच संपत्ती ते 'महाराजांना' परत देत आहेत. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले,' असा आरोपही राहुल यांनी केला.

ते दोन मुद्दे कोणते?ओडिशातील वेदांताच्या खाणकामासाठी नियामगिरीच्या भूसंपादनाला राहुल गांधींनी विरोध केला होता. त्यांनी ते बेकायदेशीर म्हटले आणि नंतर ते बंद केले. 2011 मध्ये उत्तर प्रदेशातील भट्टा, परसौल येथे भूसंपादनावरून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा विरोध दिसून आला. तत्कालीन मायावती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी भेट दिली होती आणि राहुल गांधींच्या राजकारणातील प्रवासातील हा एक लोकप्रिय प्रसंग होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा