शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

भाजप आमदारांपासून बेटी बचाव; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 15:23 IST

कथुआ, उन्नाव प्रकरणावरुन राहुल गांधींनी भाजपवर तोफ डागली

बंगळुरू: मोदी सरकारनं आधी 'बेटी बचाव, बेटी पढाव', अशी घोषणा दिली होती. मात्र आता त्या घोषणेत बदल झालाय. आता भाजपच्या आमदारांपासून बेटी बचाव, अशी सरकारची घोषणा आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपवर टीका केलीय. कथुआ आणि उन्नावमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणांमुळे देश ढवळून निघाला. कथुआमधील बलात्कार प्रकरणात भाजपचे दोन आमदार आरोपींच्या बचावासाठी रस्त्यावर उतरले होते. तर उन्नावमधील प्रकरणात भाजपच्या आमदाराला अटक करण्यात आली होती. याच घटनांचा संदर्भ देत राहुल गांधी भाजपवर बरसले. त्यांनी कलगीमध्ये जनसभेला संबोधित केलं.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी प्रचारासाठी कर्नाटकमध्ये आहेत. यावेळी जनसभेला संबोधित करताना त्यांनी दलितांवर होणाऱ्या हल्ल्यांवरुन मोदी सरकारवर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला. 'मोदी निवडणूक दौऱ्यांमधील भाषणांमध्ये कायम दलितांचा उल्लेख करतात. मात्र दलितांवरील हल्ल्यावर ते काहीही बोलत नाहीत. भाजपच्या नेत्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी दलितांवर हल्ले केल्यावर मोदी मूग गिळून गप्प बसतात,' अशा तिखट शब्दांमध्ये राहुल गांधी मोदींवर बरसले. राहुल गांधींनी महागाईच्या मुद्यावरुनदेखील मोदी सरकारला लक्ष्य केलं. जगभरात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होत असताना भारतात इंधनाचे दर कसे काय वाढतात, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. पंतप्रधान कसं खोटं बोलतात, हे देशातील तरुणांना माहितीय. मोदींनी देशातील शेतकऱ्यांचा, मुजरांचा पैसा नीरव मोदीला दिला, असाही आरोप राहुल यांनी केला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं 90 टक्के आश्वासनं पूर्ण केल्याचा दावाही त्यांनी केला.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस