शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : लोकशाहीवर हल्ले, यंत्रणांचा दुरुपयोग, माध्यमांवर दबाव; लंडनमधून राहुल गांधींची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 21:35 IST

Rahul Gandhi: 'बीबीसीने सरकारविरोधात बोलणे बंद करावे, सगळं काही ठिक होईल. सर्व खटले मागे घेतले जातील.'

Rahul Gandhi London Visit : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी लंडनमध्ये प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली. बीबीसी डॉक्युमेंटरी वादावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, 'बीबीसीवरील कारवाईची घटना म्हणजे आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. हे एक प्रकारे अदानीसारखेच आहे. हा एक प्रकारे वसाहतवादी हँगओव्हर आहे,' अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली. 

बीबीसीने सरकारविरोधात बोलणे बंद करावे...ते पुढे म्हणाले, 'बीबीसीला आताच समजलंय, पण भारतात गेल्या 9 वर्षांपासून हा प्रक्रार सुरू आहे. पत्रकारांना धमक्या दिल्या जातात, हल्ले केले जातात आणि सरकारच्या बाजुने बोलणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार दिले जातात. हा एक पॅटर्न आहे, मला वेगळी अपेक्षा नाही. जर बीबीसीने सरकारच्या विरोधात लिहिणे बंद केले तर सर्व काही पूर्वीसारखे होईल. ही भारताची नवीन विचारसरणी आहे. भारताने शांत राहावे अशी भाजपची इच्छा आहे,' असा खोचक टीकाही राहुल यांनी लगावला.

माध्यमांना गप्प करणे हा नवा ट्रेंड आहेजेव्हा राहुल गांधींना विचारण्यात आले की, मीडियाला गप्प बसवणे हा नवीन ट्रेंड आहे का? यावर ते म्हणाले, 'आज ज्या प्रमाणात हे केले जात आहे, त्या प्रमाणात हे पूर्वी कधीच केले गेले नव्हते. हा भारतीय संस्थांवरील हल्ला आहे, जो आधुनिक भारतात यापूर्वी कधीही दिसला नव्हता. त्यामुळेच भाजपच्या देशाला गप्प करण्याच्या प्रयत्नांविरोधात आवाज उठवण्यासाठी  आम्ही 'भारत जोडो यात्रा' काढली,' असेही ते म्हणाले.

लोकशाही संरचनेवर क्रूर हल्ले'भारताच्या लोकशाहीवर हल्ले होत आहेत आणि देशासाठी पर्यायी दृष्टीकोनातून एकत्र येण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. माध्यमे, संस्थात्मक संरचना, न्यायव्यवस्था, संसद या सर्वांवर हल्ले होत आहेत आणि आम्हाला लोकांचे प्रश्न सामान्य पद्धतीने मांडणे फार कठीण जात आहेत. भाजपला भारताने गप्प राहावे असे वाटते. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आणि भारताची संपत्ती आपल्या मित्रांना द्यायची,' अशी टीका राहुल यांनी केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस