शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

“गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच शोभून दिसतो, चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 9:37 AM

मोदीजी मौन सोडा, असे सांगत राहुल गांधी यांनी भारत चीन सीमावादावरून पुन्हा एकदा टीका केली आहे.

नवी दिल्ली: लडाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या भारत आणि चीन संघर्षाचा (India China Faceoff) मुद्दा वर्षभरानंतरही विरोधी पक्षांनी लावून धरला आहे. भारत आणि चीन संघर्ष तसेच सीमावाद यांवरून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Govt) काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे म्हटले आहे.

चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात ज्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, ते चिनी नागरिक असल्याचा दावा करणारे वृत्त ग्लोबल टाईम्स या चिनी माध्यमाने दिले आहे. याचाच धागा पकडून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून, यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. 

चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल

गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच शोभून दिसतो. चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल. मोदीजी, मौन सोडा, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणांची नावे चिनी ठेवल्याचे वृत्त शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच आपण १९७१ मधील गौरवपूर्ण विजयाची ५ दशके साजरी केली. देशाची सुरक्षा आणि विजयासाठी कठोर निर्णयांची गरज असते, खोट्या जुमल्यांनी विजय मिळत नसतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. 

दरम्यान, लडाख येथे झालेल्या चीन आणि भारतातील संघर्षावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्त्र सोडले. मनमोहन सिंह असते, तर केव्हाच राजीनामा दिला असता. मात्र, भाजपवाले सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दावा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला होता. काँग्रेसची लक्ष्मण रेषा सत्य आहे, तर भाजपची लक्ष्मण रेषा सत्ता आहे. हिंदुत्वाची विचारधारा मानणाऱ्या कुणाही समोर हे नतमस्तक होतात. यापूर्वी यांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली आणि आता पैशांसमोर झुकले आहेत. यांच्या मनात सत्याची भावनाच नाही, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकार