शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

काँग्रेसमधील राजीनामासत्राला राहुल गांधीच जबाबदार, राजनाथ सिंह यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 15:55 IST

 काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे संकटात सापडलेल्या कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारचा मुद्दा आज लोकसभेमध्ये उपस्थित झाला.

नवी दिल्ली -  काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे संकटात सापडलेल्या कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारचा मुद्दा आज लोकसभेमध्ये उपस्थित झाला. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी कर्नाटक सरकारवर आलेल्या संकटासाठी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप केल्यानंतर भाजपा नेते राजनाथ सिंह यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसमधील राजीनामा सत्राची सुरुवात राहुल गांधी यांनी केली असून, त्यानंतर इतर नेतेही राजीनामे देऊ लागले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी भाजपाच जबाबदार असल्याचे सांगितले. तसेच कर्नाटकमध्ये भाजपा लोकशाहीची हत्या करत आहे. आमचे सरकार पाडण्यासाठी पक्षांतराची मोहीम हाती घेतली गेली आहे. विरोधी पक्षांची सरकारे सत्तेत राहणे भाजपाल मान्य नाही. त्यासाठी आमच्या पक्षाच्या आमदारांना मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये ठेवले गेले आहे. दरम्यान, अधीररंजन चौधरी यांनी केलेल्या आरोपांना राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्त दिले. कर्नाटकमध्ये जे काही चालू आहे त्यामागे भाजपाचा हात नाही. कुणालाही आमिष दाखवून पक्षांतर करवून घेण्याचा आमचा इतिहास नाही. संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनाही टोला लगावला. ''राजीनामे देण्याची सुरुवात आम्ही केली नाही. तर काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. आता त्यांचे  एकापाठोपाठ एक दिग्गज नेते राजीनामे देत आहेत. त्याच्याशी भाजपाचे काहीही देणेघेणे नाही,''असेही ते म्हणाले.   दरम्यान,  स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असलेलं कर्नाटक सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडलं आहे. काँग्रेस, जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता जेडीएसच्या मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे सुपूर्द केले आहेत. त्यामुळे लवकरच कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते. त्यामध्ये आमदारकीचा राजीनामा दिलेल्या नाराज आमदारांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. 

 कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे. परंतु, १३ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामींच्या पाठीशी १०५ आमदारांचंच बळ आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. हे निमित्त साधून, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य भाजपा नेत्यांनीच कुमारस्वामी सरकार पाडण्याची खेळी रचल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यावरून भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकीदेखील उडत आहेत. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारण