शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: राहुल गांधींचा संघावर हल्लाबोल, केली मुस्लिम ब्रदरहुडशी तुलना, भारत-चीन संबंधांबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 09:49 IST

Rahul Gandhi: लंडनमध्ये असलेल्या राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. तसेच भारत-चीन संबंधांबाबतही महत्त्वपूर्ण विधान केले. त्याबरोबरच केंद्रातील सत्ताधारी भाजपावरही निशाणा साधला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. तसेच आपल्या वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. राहुल गांधी यांनी काल लंडनमधील चॅटम हाऊसमध्ये अनेत मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. तसेच लंडनमधील हाऊस ऑफ पार्लियामेंट परिसरामध्ये ब्रिटिश खासदारांनाही संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. तसेच भारत-चीन संबंधांबाबतही महत्त्वपूर्ण विधान केले. त्याबरोबरच केंद्रातील सत्ताधारी भाजपावरही निशाणा साधला. भारतातील सत्ताधारी पक्ष हा द्वेष आणि हिंसेच्या विचारसरणीचं अनुकरण करतो. 

थिंक टँक चॅटम हाऊसमध्ये आपले म्हणणे मांडताना राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मुस्लिम ब्रदरहुडप्रमाणे तयार झाला आहे. तसेच संघ ही एक कट्टरवादी आणि फॅसिस्ट संघटना आहे. या संघटनेने भारताच्या जवळपास सर्वस संस्थांवर कब्जा केला आहे. संघामुळे भारतामध्ये डेमोक्रॅटिक कॉम्पिटिशनची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. राहुल गांधी यांनी संघावर निशाणा साधताना सांगितलं की, प्रेस, न्यायव्यवस्था, संसद आणि निवडणूक आयोग सर्वच संस्था धोक्यात आहेत. तसेच कुठल्या ना कुठल्या मार्गाने नियंत्रित झालेल्या आहेत.

तर राहुल गांधी यांनी हाऊसस ऑफ पार्लियामेंट परिसरामध्ये ब्रिटिश खासदारांनाही संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाबाबत मोठं विधान केलं. या भारत चीन संबंधांची तुलना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाशी करत ते म्हणाले की, माझ्या मते, भारत आणि चीनच्या सीमेवर जे काही चिनी सैनिक तैनात आहेत. त्याबाबत माझं मत तेच आहे जे सध्या युक्रेनमध्ये होत आहे. मी याबाबत एस. जयशंकर यांच्याशी बोललो, मात्र त्यांनी माझ्याशी असहमती व्यक्त केली. त्यांना वाटते ही बाब हास्यास्पद आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, रशियाला युक्रेनच्या युरोप आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधांबाबत आक्षेप आहे, रशियाने सांगितले होते की, या संबंधांवर नियंत्रण आणलं नाही तर ते क्षेत्रिय अखंडतेसाठी आव्हान बनतील. आज भारताच्या सीमांवरही तेच होत आहे. कारण भारताचे अमेरिकेसोबत चांगले संबंध कायम राहावेत असे चीनला वाटत नाही. त्यामुळेच चीन भारताला सातत्याने धमकी देत आहे की, अमेरिकेशी संबंध कामय ठेवले तर आम्ही कारवाई करू. त्यामुळेच चीनने अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या सीमेवर आपलं सैन्य तैनात केलं आहे.

केंब्रिज विद्यापीठामध्ये हल्लीच केलेल्या एका भाषणात राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचं विधान केलं होतं. त्याबरोबरच त्यांनी आपली आणि इतर नेत्यांवर लक्ष ठेवलं जात असल्याचाही आरोप केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत आला होता.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाindia china faceoffभारत-चीन तणाव