शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

Rahul Gandhi: राहुल गांधींचा संघावर हल्लाबोल, केली मुस्लिम ब्रदरहुडशी तुलना, भारत-चीन संबंधांबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 09:49 IST

Rahul Gandhi: लंडनमध्ये असलेल्या राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. तसेच भारत-चीन संबंधांबाबतही महत्त्वपूर्ण विधान केले. त्याबरोबरच केंद्रातील सत्ताधारी भाजपावरही निशाणा साधला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. तसेच आपल्या वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. राहुल गांधी यांनी काल लंडनमधील चॅटम हाऊसमध्ये अनेत मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. तसेच लंडनमधील हाऊस ऑफ पार्लियामेंट परिसरामध्ये ब्रिटिश खासदारांनाही संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. तसेच भारत-चीन संबंधांबाबतही महत्त्वपूर्ण विधान केले. त्याबरोबरच केंद्रातील सत्ताधारी भाजपावरही निशाणा साधला. भारतातील सत्ताधारी पक्ष हा द्वेष आणि हिंसेच्या विचारसरणीचं अनुकरण करतो. 

थिंक टँक चॅटम हाऊसमध्ये आपले म्हणणे मांडताना राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मुस्लिम ब्रदरहुडप्रमाणे तयार झाला आहे. तसेच संघ ही एक कट्टरवादी आणि फॅसिस्ट संघटना आहे. या संघटनेने भारताच्या जवळपास सर्वस संस्थांवर कब्जा केला आहे. संघामुळे भारतामध्ये डेमोक्रॅटिक कॉम्पिटिशनची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. राहुल गांधी यांनी संघावर निशाणा साधताना सांगितलं की, प्रेस, न्यायव्यवस्था, संसद आणि निवडणूक आयोग सर्वच संस्था धोक्यात आहेत. तसेच कुठल्या ना कुठल्या मार्गाने नियंत्रित झालेल्या आहेत.

तर राहुल गांधी यांनी हाऊसस ऑफ पार्लियामेंट परिसरामध्ये ब्रिटिश खासदारांनाही संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाबाबत मोठं विधान केलं. या भारत चीन संबंधांची तुलना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाशी करत ते म्हणाले की, माझ्या मते, भारत आणि चीनच्या सीमेवर जे काही चिनी सैनिक तैनात आहेत. त्याबाबत माझं मत तेच आहे जे सध्या युक्रेनमध्ये होत आहे. मी याबाबत एस. जयशंकर यांच्याशी बोललो, मात्र त्यांनी माझ्याशी असहमती व्यक्त केली. त्यांना वाटते ही बाब हास्यास्पद आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, रशियाला युक्रेनच्या युरोप आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधांबाबत आक्षेप आहे, रशियाने सांगितले होते की, या संबंधांवर नियंत्रण आणलं नाही तर ते क्षेत्रिय अखंडतेसाठी आव्हान बनतील. आज भारताच्या सीमांवरही तेच होत आहे. कारण भारताचे अमेरिकेसोबत चांगले संबंध कायम राहावेत असे चीनला वाटत नाही. त्यामुळेच चीन भारताला सातत्याने धमकी देत आहे की, अमेरिकेशी संबंध कामय ठेवले तर आम्ही कारवाई करू. त्यामुळेच चीनने अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या सीमेवर आपलं सैन्य तैनात केलं आहे.

केंब्रिज विद्यापीठामध्ये हल्लीच केलेल्या एका भाषणात राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचं विधान केलं होतं. त्याबरोबरच त्यांनी आपली आणि इतर नेत्यांवर लक्ष ठेवलं जात असल्याचाही आरोप केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत आला होता.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाindia china faceoffभारत-चीन तणाव