शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना G20 साठी आमंत्रण नाही, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 16:17 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी युरोप दौऱ्यावर असून, बेल्जियममध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बेल्जियममधील पत्रकार परिषदेत भारतात आयोजित G20 शिखर परिषदेवर भाष्य केले. जी-20 परिषद खूप महत्त्वाची आहे आणि भारताने याचे आयोजन केले, ही खूप चांगली गोष्ट आहे. यावेळी राहुल यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना G-20 डिनरसाठी आमंत्रित न केल्याच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना डिनरचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावर राहुल गांधी म्हणाले की, सरकारने विरोधी पक्षनेत्याला बोलावले नाही, यावरुनच त्यांचे विरोधीपक्षाबद्दल असलेले मत दिसून येते. याचाच अर्थ सरकार भारतातील 60 टक्के लोकसंख्येच्या नेत्यांना किंमत देत नाहीत.

राहुल गांधींना विचारण्यात आले की, यावेळी बहुतांश युरोपियन नेते भारतात आहेत. ते पंतप्रधान आणि सरकारी अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. तुम्हाला असे वाटते का की, हिंदू राष्ट्रवादाला फ्रीपास दिला जातोय? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, जी 20 ही महत्त्वाची आहे आणि भारत याचे आयोजन करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. भारतात नक्कीच काही मुद्दे आहेत जे आम्ही उपस्थित केले आहेत, पण ते फ्रीपास देताहेत असे म्हणणे मला योग्य नाही.

यावेळी रशिया-युक्रेन युद्धावरील प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. ते म्हणाले की, आमचे रशियाशी संबंध आहेत. या मुद्द्यावर विरोधकांचे मत सरकारपेक्षा वेगळे आहे, असे मला वाटत नाही. रशिया-युक्रेन युद्धाव्यतिरिक्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, चीनने उत्पादन क्षेत्रात मोठे काम केले आहे. भारताच्या बाजूने अशी कोणतीही योजना असल्याचे दिसत नाही. 

काश्मीरमध्ये शांतता असावीजम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर काँग्रेस राहुल गांधी म्हणाले की, शांतता असायला हवी. केवळ अल्पसंख्याकांवरच नाही तर दलित आणि आदिवासींवरही हल्ले होत आहेत. काही संस्थांचा ज्या प्रकारे वापर केला जात आहे, तो अत्यंत गंभीर आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाG20 Summitजी-२० शिखर परिषदMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे