शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:40 IST

Rahul Gandhi on Election Commission: 'आमच्याकडे ठोस पुरावे, लवकरच समोर आणणार.'

Rahul Gandhi on Election Commission: मागील काही काळापासून विरोधक सातत्याने निवडणूक आयोगावर भाजपसाठी काम केल्याचा आरोप करत आहेत. बिहारमधील मतदार यादीवरुन तर बराच गदारोळ सुरू आहे. अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी(दि.1) निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला. 'मतं चोरीला जात आहेत. आमच्याकडे याचे ठोस पुरावे आहेत. मी गांभीर्याने बोलतोय, निवडणूक आयोगच या मतचोरीत सहभागी आहे. आयोग हे भाजपसाठी करत आहे,' असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

संसद भवन परिसरात मीडियाशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'आम्हाला मध्य प्रदेशात शंका होती. लोकसभा निवडणुकीतही शंका होती. महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान आमची शंका आणखी वाढली. आम्हाला संशय होता की, राज्य पातळीवर एक कोटी मतदार जोडले गेले आहेत. आम्ही तपशीलात गेलो, मात्र निवडणूक आयोगाने मदत केली नाही. आम्ही स्वतःहून चौकशी केली. त्याला सहा महिने लागले. पण आम्हाला जे सापडले आहे, ते अणुबॉम्बसारखे आहे. हे जर फुटले, तर तुम्हाला भारतात कुठेही निवडणूक आयोग दिसणार नाही.'

'मते चोरीला जात आहेत. आमच्याकडे आता याचे ठोस पुरावे आहेत. निवडणूक आयोगही यात सहभागी आहे. मी हे अगदी गंभीरपणे सांगतोय, निवडणूक आयोगातील जो कोणी हे काम करत आहे. वरपासून खालपर्यंत...आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही भारताविरुद्ध काम करत आहात, हा देशद्रोह आहे. तुम्ही कुठेही असाल, निवृत्त व्हा, कुठेही जा...आम्ही तुम्हाला शोधून काढू,' असा इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

यापूर्वी केलेला गंभीर आरोपराहुल गांधी यांनी यापूर्वी म्हटले होते की, महाराष्ट्र निवडणुकीत आमची फसवणूक झाली. आम्ही निवडणूक आयोगाला मतदार यादी दाखवण्यास सांगितले, पण आम्हाला मतदार यादी दाखवण्यात आली नाही. आम्ही म्हटले होते की व्हिडिओग्राफी दाखवावी, नंतर व्हिडिओग्राफीचा कायदाच बदलण्यात आला. महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदार जोडले गेले. आम्ही कर्नाटकात नुकतेच संशोधन केले, तिथे एक मोठी चोरी पकडली आहे.

चोरी कशी आणि कुठे केली जाते, हे आम्ही लवकरच सर्वांसमोर घेऊन येऊ. आता त्यांना कळले आहे की, आम्हाला त्यांचा खेळ समजला आहे. आम्ही एक मतदारसंघ निवडला आणि तिथे सखोल संशोधन केले. आम्ही त्यांची संपूर्ण व्यवस्था शोधून काढली, ते चोरी कशी करतात, कोण मतदान करते, ते कसे मतदान करतात, नवीन मतदार कसे तयार होतात. आता त्यांना समजले आहे, त्यामुळेच त्यांनी बिहारची संपूर्ण व्यवस्था नवीन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मतदार हटवतील आणि मतदार याद्या नवीन पद्धतीने बनवतील. भारतात निवडणुका चोरीला जात आहेत, हे वास्तव आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाcongressकाँग्रेस