शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

'जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर...', राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 20:18 IST

Rahul Gandhi on Caste Census : राहुल गांधी लोकसभा निवडणुकीपासून जात जनगणनेची मागणी करत आहेत.

Rahul Gandhi on Caste Census : काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून देशात जात जनगणनेची मागणी करत आहेत. त्यांच्यासोबतच इतर अनेक विरोधी पक्षांनीही ही मागणी केली आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीदेखील या मागणीला समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन सध्या राजकारण तापले आहे. दरम्यान, आता आजही राहुल गांधी यांनी जात जनगणनेच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला धारेवर धरले आहे.

एका हिंदी मीडिया हाउसने जात जणगणनेबाबत लोकांची मते जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले, ज्यात बहुतांश लोकांनी जात जणगणनेची मागणी केल्याचे समोर आले आहे. यावरुन राहुल गांधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर म्हणाले की, 'मोदीजी, तुम्ही जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही स्वप्न पाहत आहात. आता कोणतीही शक्ती जात जणगणना थांबवू शकत नाही. भारताचा आदेश आला आहे, लवकरच 90% भारतीय जात जनगणनेला पाठिंबा देतील आणि मागणी करतील. आताच आदेशाची अंमलबजावणी करा, नाहीतर पुढचे पंतप्रधान हे करताना दिसतील,' अशी बोचरी टीका त्यांनी आपल्या पोस्टमधून केली.

मिस इंडिया ते क्रिकेट टीम...राहुल गांधींनी उपस्थित केला प्रश्न ?अलीकडेच जात जनगणनेची मागणी करताना राहुल गांधी म्हणाले की, 'मी माजी मिस इंडियाची यादी पाहिली, पण विजेत्यांमध्ये एकही दलित, आदिवासी किंवा ओबीसी आढळली नाही. काही लोक क्रिकेट किंवा बॉलिवूडबद्दल बोलतील. मोची किंवा प्लंबरला कोणीही दाखवणार नाही. मीडियातील टॉप अँकरही दलित, आदिवासी किंवा ओबीसी समाजातील नाही. संस्था, कॉर्पोरेट्स, बॉलिवूड, मिस इंडियामध्ये 90 टक्के लोकांपैकी किती लोक आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. मी फक्त एवढेच सांगेल की, 90 टक्के लोकांचा यात सहभाग नाही आणि हे थांबले पाहिजे,' अशीही टीका त्यांनी केली.

'मागास समाजाची चेष्टा करू नका' राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी राहुल गांधींवर 'बालबुद्धी' म्हणत थेट निशाणा साधला. किरेन रिजिजू म्हणाले, 'राहुल गांधी देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्यांना (राहुल गांधी) मिस इंडिया स्पर्धा, बॉलिवूड आणि खेळांतही आरक्षण हवे आहे. हा केवळ 'बालबुद्धीचा' मुद्दा नसून त्याचा जयजयकार करणारे लोकही तेवढेच जबाबदार आहेत. मागास समाजाची चेष्टा करू नका,' अशी टीका त्यांनी केली.

मायावतींचा राहुल गांधींना सवालदरम्यान, राहुल गांधी यांच्या मागणीवर बसपा सुप्रीमो मायावती यांनी पलटवार केला आहे. 'काँग्रेस एवढी वर्षे सत्तेत होती, तेव्हा त्यांनी जातिनिहाय जनगणना का केली नाही? काँग्रेस हा दुटप्पी भूमिका असलेला पक्ष आहे. याच काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान दिला नाही. बाबासाहेब हयात असताना आणि त्यांचे निधन झाल्यानंतरही त्यांना काँग्रेसने भारतरत्न सन्मान दिला नाही. काशीराम यांच्या निधनानंतर एक दिवसाचा दुखवटाही पाळला नाही,' अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस