शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi News: '45 दिवस पोलीस झोपले होते का..?' राहुल गांधींच्या चौकशीवरुन काँग्रस नेत्यांचा भाजपवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 15:10 IST

Rahul Gandhi News: श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले. यावरुन काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, अशोक गेहलोत आणि पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, अवघ्या तीन दिवसांत नोटीस देऊन पोलीस राहुल गांधींच्या घरी पोहोचले आणि तेही ४५ दिवसांनी. राहुल गांधी सरकारला अवघड प्रश्न विचारत असल्याने हे सर्व घडत आहे का? हा निव्वळ छळ आहे,' अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, '16 मार्च रोजी सकाळी राहुल गांधींना नोटीस देण्यात आली होती आणि त्यात दोन पानांचे प्रश्न होते, ज्यामध्ये राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान भेटलेल्या लाखो लोकांची माहिती देण्यास सांगितले. असे प्रश्न तुम्ही आतापर्यंत किती पक्षांना विचारला आहे? गेल्या 70 वर्षांत कोणत्याही राजकीय प्रचारात असे प्रश्न विचारले गेले असतील, असे मला वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे 45 दिवस पोलीस काहीच बोलले नाहीत आणि अचानक पोलीस खडबडून जागे झाले. इतक्या दिवस पोलीस झोपले होते का? हे सूडाचे राजकारण आहे,' असे ते म्हणाले.

अशोक गेहलोत काय म्हणाले?यावेळी अशोक गेहलोत म्हणाले, 'वरुन सिग्नल मिळाल्याशिवाय दिल्ली पोलिस हे करू शकत नाहीत. आजच्या घडामोडी विश्वासाच्या पलीकडे आहेत. हिटलरदेखील पूर्वी खूप लोकप्रिय होता, नंतर तिथे काय झाले ते सर्वांनी पाहिले. सध्या देशात एजन्सीचा नंगा नाच सुरू आहे. राहुल गांधी यापुढेही बोलत राहतील. संपूर्ण देश घाबरला आहे. हे लोक हिंदू-मुस्लिमाचे राजकारण करत आहेत. खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आला. दिल्ली पोलीस हे काम स्वतः करू शकतात यावर माझा विश्वास नाही,' असे ते म्हणाले. 

जयराम रमेश यांनी भाजपवर निशाणा साधलापत्रकार परिषदेत जयराम रमेश म्हणाले की, 'हे सर्व अदानी प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी सुरू आहे. जेव्हापासून 16 पक्ष एकाच वेळी जेपीसीची मागणी करत आहेत, तेव्हापासून राहुल गांधी निशाण्यावर आहेत. आधी त्यांच्या लंडनमधील विधानाचा विपर्यास केला गेला, आता काश्मीरमधल्या वक्तव्यावरुन हे सुरू आहे. जोपर्यंत हे सूडबुद्धीचे राजकारण सुरू राहील, तोपर्यंत मधला मार्ग निघणे शक्य नाही', असे ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिस