शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Rahul Gandhi News: '45 दिवस पोलीस झोपले होते का..?' राहुल गांधींच्या चौकशीवरुन काँग्रस नेत्यांचा भाजपवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 15:10 IST

Rahul Gandhi News: श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले. यावरुन काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, अशोक गेहलोत आणि पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, अवघ्या तीन दिवसांत नोटीस देऊन पोलीस राहुल गांधींच्या घरी पोहोचले आणि तेही ४५ दिवसांनी. राहुल गांधी सरकारला अवघड प्रश्न विचारत असल्याने हे सर्व घडत आहे का? हा निव्वळ छळ आहे,' अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, '16 मार्च रोजी सकाळी राहुल गांधींना नोटीस देण्यात आली होती आणि त्यात दोन पानांचे प्रश्न होते, ज्यामध्ये राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान भेटलेल्या लाखो लोकांची माहिती देण्यास सांगितले. असे प्रश्न तुम्ही आतापर्यंत किती पक्षांना विचारला आहे? गेल्या 70 वर्षांत कोणत्याही राजकीय प्रचारात असे प्रश्न विचारले गेले असतील, असे मला वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे 45 दिवस पोलीस काहीच बोलले नाहीत आणि अचानक पोलीस खडबडून जागे झाले. इतक्या दिवस पोलीस झोपले होते का? हे सूडाचे राजकारण आहे,' असे ते म्हणाले.

अशोक गेहलोत काय म्हणाले?यावेळी अशोक गेहलोत म्हणाले, 'वरुन सिग्नल मिळाल्याशिवाय दिल्ली पोलिस हे करू शकत नाहीत. आजच्या घडामोडी विश्वासाच्या पलीकडे आहेत. हिटलरदेखील पूर्वी खूप लोकप्रिय होता, नंतर तिथे काय झाले ते सर्वांनी पाहिले. सध्या देशात एजन्सीचा नंगा नाच सुरू आहे. राहुल गांधी यापुढेही बोलत राहतील. संपूर्ण देश घाबरला आहे. हे लोक हिंदू-मुस्लिमाचे राजकारण करत आहेत. खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आला. दिल्ली पोलीस हे काम स्वतः करू शकतात यावर माझा विश्वास नाही,' असे ते म्हणाले. 

जयराम रमेश यांनी भाजपवर निशाणा साधलापत्रकार परिषदेत जयराम रमेश म्हणाले की, 'हे सर्व अदानी प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी सुरू आहे. जेव्हापासून 16 पक्ष एकाच वेळी जेपीसीची मागणी करत आहेत, तेव्हापासून राहुल गांधी निशाण्यावर आहेत. आधी त्यांच्या लंडनमधील विधानाचा विपर्यास केला गेला, आता काश्मीरमधल्या वक्तव्यावरुन हे सुरू आहे. जोपर्यंत हे सूडबुद्धीचे राजकारण सुरू राहील, तोपर्यंत मधला मार्ग निघणे शक्य नाही', असे ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिस