शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Rahul Gandhi News: '45 दिवस पोलीस झोपले होते का..?' राहुल गांधींच्या चौकशीवरुन काँग्रस नेत्यांचा भाजपवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 15:10 IST

Rahul Gandhi News: श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिल्ली पोलीस रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले. यावरुन काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, अशोक गेहलोत आणि पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, अवघ्या तीन दिवसांत नोटीस देऊन पोलीस राहुल गांधींच्या घरी पोहोचले आणि तेही ४५ दिवसांनी. राहुल गांधी सरकारला अवघड प्रश्न विचारत असल्याने हे सर्व घडत आहे का? हा निव्वळ छळ आहे,' अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, '16 मार्च रोजी सकाळी राहुल गांधींना नोटीस देण्यात आली होती आणि त्यात दोन पानांचे प्रश्न होते, ज्यामध्ये राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान भेटलेल्या लाखो लोकांची माहिती देण्यास सांगितले. असे प्रश्न तुम्ही आतापर्यंत किती पक्षांना विचारला आहे? गेल्या 70 वर्षांत कोणत्याही राजकीय प्रचारात असे प्रश्न विचारले गेले असतील, असे मला वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे 45 दिवस पोलीस काहीच बोलले नाहीत आणि अचानक पोलीस खडबडून जागे झाले. इतक्या दिवस पोलीस झोपले होते का? हे सूडाचे राजकारण आहे,' असे ते म्हणाले.

अशोक गेहलोत काय म्हणाले?यावेळी अशोक गेहलोत म्हणाले, 'वरुन सिग्नल मिळाल्याशिवाय दिल्ली पोलिस हे करू शकत नाहीत. आजच्या घडामोडी विश्वासाच्या पलीकडे आहेत. हिटलरदेखील पूर्वी खूप लोकप्रिय होता, नंतर तिथे काय झाले ते सर्वांनी पाहिले. सध्या देशात एजन्सीचा नंगा नाच सुरू आहे. राहुल गांधी यापुढेही बोलत राहतील. संपूर्ण देश घाबरला आहे. हे लोक हिंदू-मुस्लिमाचे राजकारण करत आहेत. खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आला. दिल्ली पोलीस हे काम स्वतः करू शकतात यावर माझा विश्वास नाही,' असे ते म्हणाले. 

जयराम रमेश यांनी भाजपवर निशाणा साधलापत्रकार परिषदेत जयराम रमेश म्हणाले की, 'हे सर्व अदानी प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी सुरू आहे. जेव्हापासून 16 पक्ष एकाच वेळी जेपीसीची मागणी करत आहेत, तेव्हापासून राहुल गांधी निशाण्यावर आहेत. आधी त्यांच्या लंडनमधील विधानाचा विपर्यास केला गेला, आता काश्मीरमधल्या वक्तव्यावरुन हे सुरू आहे. जोपर्यंत हे सूडबुद्धीचे राजकारण सुरू राहील, तोपर्यंत मधला मार्ग निघणे शक्य नाही', असे ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिस