शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लोकसभेतील गदारोळानंतर दानिश अलींना भेटण्यासाठी राहुल गांधी पोहोचले घरी; बसप खासदार झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 21:35 IST

भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी लोकसभेत चंद्रयान-3 वरील चर्चेदरम्यान बसपा खासदार दानिश अली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले होते.

भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. बिधुडी यांच्या वक्तव्यावर चौफेर टीका होत असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी शुक्रवारी दानिश अली यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि खासदार इम्रान प्रतापगढ़ीही होते. 

भाजपने केली कारवाई! खासदार रमेश बिधूडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली, 15 दिवसांत उत्तर द्यावं लागणार

दानिश अली यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. राहुल गांधी म्हणाले, द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान सुरू होत आहे. राहुल गांधींनी भेट घेतल्यानंतर  दानिश अली भावूक झाले आणि म्हणाले की, राहुल यांना भेटल्यानंतर मला वाटले की ते एकटे नाहीत.राहुल गांधी मला प्रोत्साहन देण्यासाठी इथे आले होते. या गोष्टी मनावर घेऊ नका आणि तब्येतीची काळजी घ्या असंही राहुल गांधी मला म्हणाले. त्यांच्या बोलण्याने मला आराम वाटला आणि मी एकटी नाही हे चांगले वाटले, असंही दानिश अली म्हणाले. 

दानिश अली म्हणाले की, हे विधान माझ्यावर हल्ला नसून लोकशाही आणि संविधानावर हल्ला आहे. अमृतकाळात रस्त्यावर आणि आता नव्या संसदेतही द्वेषाची दुकाने उघडली जात आहेत, हे खेदजनक आहे. लोकसभा आमची रक्षक आहे.

भाजपने केली कारवाई! 

लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजपने भाजप खासदार रमेश बिधूडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याआधी लोकसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्या वर्तनावर कठोर कारवाईचा इशारा दिला होता.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेवरून भाजपने रमेश बिधूडी यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. दरम्यान, बसपा खासदार दानिश अली यांनी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्षांना विशेषाधिकार नोटीस दिली होती आणि हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे चौकशी आणि कारवाईसाठी पाठवण्याची विनंती केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा