शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

...अन् राहुल गांधी इतिहासात चुकले; काँग्रेसचं स्थापना ठिकाणच विसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 20:46 IST

उत्तर प्रदेशात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींची चूक

मुंबई: काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आज प्रथमच प्रियंका गांधी यांनी लखनऊमध्ये रोड शो केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह खासदार ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियंका गांधी, तर पश्चिम भागाची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रियंका आणि राहुल यांच्या शोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या रोड शोनंतर राहुल यांनी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मात्र यावेळी राहुल गांधींना इतिहासाचा काहीसा विसर पडला. काँग्रेस पक्षाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली. त्यामुळे या राज्यात पक्ष कमकुवत राहू शकत नाही, असं राहुल गांधींनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं. त्यामुळे राज्यात पक्ष बळकट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मात्र काँग्रेसची स्थापना उत्तर प्रदेशात नव्हे, तर मुंबईत झालेली आहे. काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत झाली. तेव्हा मुंबई बॉम्बे नावानं ओळखली जायची. गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळी 72 प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेसच्या संकेतस्थळावर ही माहिती छायाचित्रासह उपलब्ध आहे. 

अ‍ॅलन ह्युम यांनी काँग्रेसची स्थापना केली. संस्थापक ह्युम यांनी कोलकात्याच्या व्योमेश चंद्र बॅनर्जी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. काँग्रेस पक्षाचे सुरुवातीचे सदस्य बॉम्बे आणि मद्रास प्रांतातले होते. यानंतर 19 व्या शतकाच्या अखेरपासून काँग्रेसनं स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून स्वातंत्र्य लढा आणखी तीव्र झाला. यामध्ये काँग्रेसनं महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसच्या दीड कोटी सदस्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. भारताच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस देशातला प्रमुख पक्ष ठरला. स्वातंत्र्यानंतर झालेल्या आतापर्यंतच्या 16 निवडणुकांपैकी 6 निवडणुकांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं. तर चारवेळा काँग्रेसनं आघाडी सरकार स्थापन केलं. काँग्रेसचे सात नेते देशाचे पंतप्रधान झाले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु काँग्रेसचे नेते होते. 1947 ते 1965 या कालावधीत नेहरुंनी देशाचं नेतृत्त्व केलं होतं. तर इंदिरा गांधी 15 वर्ष देशाच्या पंतप्रधान होत्या. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndira Gandhiइंदिरा गांधी