शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 21:15 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर आरोपही केले आहेत.

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. उद्या तिसऱ्या टप्पा पार पडणार आहे. यात राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असल्याचे बघायला मिळत आहे. यातच आता, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर आरोपही केले आहेत. राहुल यांनी लिहिले आहे, "माझ्या प्रिय काँग्रेस कार्यकर्त्यांनो, ही निवडणूक सामान्य निवडणूक नाही. केवळ राजकीय पक्षांमधील लढाई नाही, तर आपली लोकशाही आणि आपली राज्यघटना वाचवण्याची लढाई आहे."

आपण पक्षाचा कणा -राहुल यांनी पुढे लिहिले, "एका बाजूला काँग्रेसची प्रेम आणि न्यायाची विचारधारा आहे, तर दुसऱ्या बाजूला मोदी सरकार, भाजप आणि आरएसएसची भीती, द्वेष आणि विभाजनाची विचारधारा आहे. या लढ्यात काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी ताकद आपल्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आपण उग्र आणि निर्भय आहात, कारण काँग्रेसची विचारधारा आपल्या मनात, आपल्या विचारांत आणि आपल्या कृतीत आहे. आपण पक्षाचा कणा आहात आणि आपल्याशिवाय आम्ही जिंकू शकत नाही."

"आपण आतापर्यंत केलेल्या मेहनतीबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आपल्यामुळेच आम्ही भारतातील लोकांचे ऐकून एक क्रांतिकारी जाहीरनामा तयार करू शकलो. आपण निवडणुकीतील पहिल्या दोन टप्प्यांत चांगल्या पद्धतीने संघर्ष केला आहे. आपण भाजपच्या खोट्या आणि लक्ष भरकटवणाऱ्या गोष्टींना विरोध करण्यास सक्षम आहोत आणि त्यांना उत्तर देण्यासही भाग पाडू शकतो," असेही राहुल यांनी लिहिले आहे.

आणखी एक महिना कठोर मेहनत -"आता आणखी एक महिना कठोर मेहनत करण्याची वेळ आहे. आपली गॅरंटी प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचायला हवी. प्रत्येकाने मतदान करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या आपण सर्व जन काँग्रेसचा संदेश आणि आपली गॅरंटी प्रत्येक गावात, मोहल्ला, गल्ली आणि घरा-घरापर्यंत पोहोचू. आता घरा घरापर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे. आपल्याला प्रत्येक तरुण, महिला, मजूर, शेतकरी आणि वंचित कुटुंबापर्यंत पोहोचावे लागेल. आपण भाजपची विचारधारा आणि त्यांच्या द्वेशाच्या अजेंड्यामुळे निर्माण झालेला धोका स्पष्ट करायला हवा. या लढाईत मी माझे सर्व काही देत आहे आणि मला आपल्याकडूनही हीच अपेक्षा आहे," असेही राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

शेवटी राहुल यांनी लिहिले, "मी जाणतो, जोपर्यंत काँग्रेसचा एकही कार्यकर्ता सत्याच्या बाजूने उभा आहे, तोवर भारतात द्वेषाचा विजय होऊ शकत नाही. आणि आपण एक नाही, तर कोट्यवधी आहोत. आपण सर्व मिळून लढू, जिंकू आणि देशाची स्थिती बदलू. आपले समर्थन, समर्पण आणि प्रेम यासाठी माझे प्रेम आणि आभार. जय हिंद"

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदी