शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत; 'त्या' आरोपांवर पीयूष गोयल यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 22:05 IST

'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे राहुल गांधी नाराज, त्यामुळेच परदेशी आणि भारतीय गुंतवणूकदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.'

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता शेअर बाजार कोसळण्यावरुन राहुल गांधी यांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. आज राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामण यांच्यावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. या आरोपांवर आता भाजप नेते पीयूष गोयल यांनी जोरदार पलटवार केला. त्यांनी राहुल गांधींवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेतभाजप नेते पीयूष गोयल यांनीदेखील आज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या आरोपांवर पलटवार केला. 'लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव झाल्यामुळे राहुल गांधी निराश आहेत, त्यामुळेच ते आमच्या नेत्यांवर बेछूट आरोप करत आहेत. आज भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून, संपूर्ण जग भारताला सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून स्वीकारत आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी ग्वाही दिली आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे राहुल गांधी नाराज झाले आहेत आणि त्यामुळेच परदेशी आणि भारतीय गुंतवणूकदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत,' असा आरोप त्यांनी केला.

याचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना झाला'भारतीय बाजारपेठेने मागील 60 वर्षात जेवढे मार्केट कॅप गाठले, त्यापेक्षा पाच पटीने वाढ मोदी सरकारच्या कार्यकाळात झाली. त्याचा सर्वात मोठा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांना झाला. आज ते फक्त दुरुनच बाजार पाहत नाही, तर गुंतवणूक करतात आणि त्याचा थेट फायदा घेतात. UPA च्या काळात FPI ची होल्डिंग 21% होती, ती आज 16% वर आली आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा कमी झाला आहे आणि भारतीय गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात बाजार वधारत असताना परदेशी लोकांनी बाजारात विक्री केली आणि भारतीय गुंतवणूकदारांनी याचा फायदा घेतला केली. ज्या दिवशी एक्झिट पोल आला, त्या दिवशी परदेशी लोकांनी चढ्या भावाने खरेदी केली आणि भारतीय गुंतवणूकदारांनी चढ्या भावाने विक्री करून नफा कमावला,' असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

देशातील जनता आपले हक्क आणि न्याय मागत आहेपीयूष गोयल पुढे म्हणाले, 'मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या यशस्वी कामाचा शेअर बाजारातील भारतीय गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. त्यामुळेच आज देश आणि जगाचा भारत आणि मोदींवर विश्वास आहे. आज जनतेसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की, राहुल गांधींनी दिलेल्या सर्व आश्वासनांचे काय झाले? देशात अनेक ठिकाणी महिला काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या आहेत. तेलंगणा, हिमाचल आणि कर्नाटकमधील काँग्रेस सरकारांना प्रति महिला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन का पूर्ण करता आले नाही? महिला काँग्रेस सरकारकडे त्यांचे हक्क आणि न्याय मागत आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीpiyush goyalपीयुष गोयलshare marketशेअर बाजार