शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत; 'त्या' आरोपांवर पीयूष गोयल यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 22:05 IST

'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे राहुल गांधी नाराज, त्यामुळेच परदेशी आणि भारतीय गुंतवणूकदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.'

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता शेअर बाजार कोसळण्यावरुन राहुल गांधी यांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. आज राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामण यांच्यावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. या आरोपांवर आता भाजप नेते पीयूष गोयल यांनी जोरदार पलटवार केला. त्यांनी राहुल गांधींवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेतभाजप नेते पीयूष गोयल यांनीदेखील आज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या आरोपांवर पलटवार केला. 'लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा पराभव झाल्यामुळे राहुल गांधी निराश आहेत, त्यामुळेच ते आमच्या नेत्यांवर बेछूट आरोप करत आहेत. आज भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून, संपूर्ण जग भारताला सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून स्वीकारत आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी ग्वाही दिली आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे राहुल गांधी नाराज झाले आहेत आणि त्यामुळेच परदेशी आणि भारतीय गुंतवणूकदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत,' असा आरोप त्यांनी केला.

याचा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना झाला'भारतीय बाजारपेठेने मागील 60 वर्षात जेवढे मार्केट कॅप गाठले, त्यापेक्षा पाच पटीने वाढ मोदी सरकारच्या कार्यकाळात झाली. त्याचा सर्वात मोठा फायदा भारतीय गुंतवणूकदारांना, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांना झाला. आज ते फक्त दुरुनच बाजार पाहत नाही, तर गुंतवणूक करतात आणि त्याचा थेट फायदा घेतात. UPA च्या काळात FPI ची होल्डिंग 21% होती, ती आज 16% वर आली आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा कमी झाला आहे आणि भारतीय गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात बाजार वधारत असताना परदेशी लोकांनी बाजारात विक्री केली आणि भारतीय गुंतवणूकदारांनी याचा फायदा घेतला केली. ज्या दिवशी एक्झिट पोल आला, त्या दिवशी परदेशी लोकांनी चढ्या भावाने खरेदी केली आणि भारतीय गुंतवणूकदारांनी चढ्या भावाने विक्री करून नफा कमावला,' असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

देशातील जनता आपले हक्क आणि न्याय मागत आहेपीयूष गोयल पुढे म्हणाले, 'मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या यशस्वी कामाचा शेअर बाजारातील भारतीय गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. त्यामुळेच आज देश आणि जगाचा भारत आणि मोदींवर विश्वास आहे. आज जनतेसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे की, राहुल गांधींनी दिलेल्या सर्व आश्वासनांचे काय झाले? देशात अनेक ठिकाणी महिला काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या आहेत. तेलंगणा, हिमाचल आणि कर्नाटकमधील काँग्रेस सरकारांना प्रति महिला एक लाख रुपये देण्याचे आश्वासन का पूर्ण करता आले नाही? महिला काँग्रेस सरकारकडे त्यांचे हक्क आणि न्याय मागत आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीpiyush goyalपीयुष गोयलshare marketशेअर बाजार