शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राहुल गांधींनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; शेतात ट्रॅक्टरही चालवला अन् भात लावणी सुद्धा केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 10:31 IST

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची लोकप्रियता वाढली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आज शिमला दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी अचानक सोनीपतच्या बरोदा मतदारसंघातील अनेक गावांतील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पोहोचले. यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे विचार जाणून घेतले. तसेच, राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसोबत मदिना आणि बरोजा येथे भात पिकाची लागवड सुद्धा केली. विशेष म्हणजे, यावेळी राहुल गांधी यांनी शेतात ट्रॅक्टरही चालवला. 

दरम्यान, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची लोकप्रियता वाढली आहे. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न लोकांना आवडत आहे. कर्नाटक निवडणुकीतही असेच काहीसे पाहायला मिळाले. यादरम्यान राहुल गांधींनी डिलिव्हरी बॉईजपासून ते बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांपर्यंत अनेकांची भेट घेतली होती. आता सोनिपतमध्येही ते शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

दुसरीकडे, राहुल गांधींचा शिमला दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा मोदी आडनावाच्या टिप्पणीवरून गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आणि त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला असून, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये निदर्शने केली, शिमल्यात राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आणि भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. भाजप सरकार ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासोबतच पक्षाचे नेते प्रत्येक परिस्थितीत राहुल गांधींच्या पाठीशी उभे असल्याचेही सांगण्यात आले.भाजपकडून मात्र न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीcongressकाँग्रेस