शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

'संपूर्ण देशात मतदार यादीवर संशय, चर्चा व्हायला हवी', राहुल गांधींची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:09 IST

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून (10 मार्च) सुरू झाला आहे.

Rahul Gandhi in Loksabha: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून (10 मार्च) सुरू झाला आहे. 4 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 16 बैठका होणार आहेत. या कालावधीत वक्फ कायद्यासह सुमारे 36 विधेयके मांडण्याची तयारी सरकार करत आहे. दरम्यान, आज लोकसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीचा मुद्दा उपस्थित केला. 

मतदार यादीवर सभागृहात चर्चा आवश्यक विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, संपूर्ण देशात आणि प्रत्येक विरोधी राज्यात मतदार यादीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील मतदार यादीत गडबड असल्याचा संशय व्यक्त होतोय. या मतदार यादीवर सभागृहात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

लोकसभा व्यतिरिक्त राहुल गांधी यांनी मतदार यादीबाबत X वर एक पोस्ट देखील केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, संपूर्ण विरोधी पक्ष संसदेत मतदार यादीवर सविस्तर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्राच्या मतदार यादीतील अनियमिततेबाबत माझी पत्रकार परिषद होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला, मात्र पारदर्शकतेबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. आता मतदार यादीतील दुबार नावांचे नवे पुरावे समोर आले असून, त्यामुळे नवे आणि गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे, असेही राहुल म्हणाले.

कपिल सिब्बल काय म्हणाले?मतदार यादीवर बोलताना माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले, निवडणूक आयोग सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. लोकशाही अशीच चालू राहिली आणि निवडणूक आयोग सरकारची वकिली करत राहिला, तर निश्चितच निकाल तुमच्यासमोर आहेत.

बंगालमध्ये बनावट मतदार सुरू आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले, निवडणूक आयोग आणि भाजप मिळून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतात. बनावट मतदार तयार करत आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीत केले आणि आता बंगालमध्ये सुरू झाले आहे. निवडणूक प्रक्रियाच निष्पक्ष नसेल, तर काय करायचे. या संपूर्ण निवडणूक घोटाळ्यात सरकार आणि निवडणूक आयोगाची बाजू पुढे यायला हवी.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग