शहरं
Join us  
Trending Stories
1
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
2
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
3
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
4
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
5
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
6
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
7
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
8
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
9
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
10
पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
11
जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 
12
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
13
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
14
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
15
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
16
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
17
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
18
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
19
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
20
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

"राहुल गांधी कदाचित आज उशिरा उठले असतील..."; संसदेत भाजपा खासदाराने उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:10 IST

Rahul Gandhi vs BJP, No trust motion voting: मणिपूर हिंसाचाराच्या प्रसंगानंतर संसदेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे ...

Rahul Gandhi vs BJP, No trust motion voting: मणिपूर हिंसाचाराच्या प्रसंगानंतर संसदेत आज मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे गौरव गोगई यांनी लोकसभेत प्रस्ताव मांडला. त्यानंतर या प्रस्तावर चर्चेला सुरुवात झाली. आज सुरु झालेली चर्चा १० ऑगस्टपर्यंत चालेल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर उत्तर देतील. या चर्चेत राहुल गांधी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर या चर्चेची सुरूवातच राहुल गांधी करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण प्रत्यक्षात मात्र गौरव गोगई यांनी प्रस्ताव मांडला. त्यावरून भाजपाचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल आणि काँग्रेसला चिमटा काढला.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्दबातल ठरवण्यात आली होती. पण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी त्यांना परत बहाल केली. त्यानंतर राहुल आज या चर्चेत सहभागी होतील आणि सुरूवात करतील अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यानंतर, अविश्वास प्रस्तावाला विरोध दर्शवताना निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी म्हणाले की, "अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी येणार असल्याचे आम्ही यापूर्वी ऐकत होतो, मात्र ते आले नाहीत. कदाचित ते आज सकाळी उशिरा उटले असतील. त्यांना उशिरा जाग आली असेल. म्हणून गौरव गोगई यांनी प्रथम चर्चा सुरू केली."

मी अविश्वास ठरावाच्या विरोधात उभा राहिलो आहे. मणिपूरची चर्चा झाली. एवढ्या महत्त्वाच्या विधेयकावर बोलण्यासाठी पक्षाने मला उभे केले, ही महत्त्वाची बाब आहे. पण काँग्रेसकडून राहुल गांधी न बोलणे हे भाषण लहान करण्याचा प्रकार आहे. यासाठीच त्यांनी गुगली टाकल्यासारखे केले. गौरव गोगई हौतात्म्याबद्दल बोलत होते. पण संपूर्ण काँग्रेसला हौतात्म्याची काहीच माहिती नाही. तुम्हाला मणिपूरबद्दलही माहिती नसेल. तुमच्यापैकी बरेच जण मणिपूरला गेलेही नसतील. मी मणिपूरच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. मणिपूरमध्ये माझ्या मामाचा पाय गमावला. ते 'सीआरपीएफ'चे डीआयजी होते. एन के तिवारी मणिपूरला आयजी म्हणून गेले तेव्हा तुमच्या (काँग्रेस) सरकारने त्यांना अटक केली," असे त्यांनी सांगितले.

"तुम्ही राष्ट्रवादावर बोलत आहात. 83 च्या निवडणुकीत आसाममध्ये किती टक्के लोकांनी मतदान केले. किती लोक मारले गेले. तुम्ही ऑल इंडिया आसाम स्टुडंट युनियनशी करार केला होता तेव्हा त्या कराराचा एक भाग होता की हे सरकार हटवले जाईल. तुमचे सरकार संपेल. तो तडजोडीचा भाग नव्हता का? मी गृहमंत्र्यांना सांगेन की त्यांनी उत्तर देताना कराराचे संपूर्ण स्वरूप सांगावे", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस