शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

राहुल गांधी इटलीत जा! अमेठीत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 14:04 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांकडून विरोधाचा सामना करावा लागला राहुल गांधी इटलीला जा, अशी घोषणाबाजी काही शेतकऱ्यांनी केलीशेतजमिनीच्या विवादामुळे राहुल गांधी शेतकऱ्यांवर नाराज

अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. आपला पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्येही त्यांनी दौरे वाढवले आहेत. मात्र अमेठी दौऱ्यादरम्यान त्यांना विरोधाचा सामना करावा लागला, राहुल गांधी इटलीला जा, अशी घोषणाबाजी काही शेतकऱ्यांनी केली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची  जमीन राजीव गांधी फाउंडेशनला देण्यात आलेली आहे. ही जमीन आम्हला परत द्या किंवा आम्हाला नोकऱ्या तरी द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली. आंदोलनकर्ते शेतकरी हे गौरीगंज येथील रहिवासी असल्याचे वृत्त आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने एएनआयला सांगितले की, राहुल गांधीमुळे आम्ही खूप दु:खी आहोत. त्यांनी आमची जमीन हडप केली आहे. त्यांनी परत इटलीला निघून जावे.''  या शेतकऱ्यांनी सम्राट सायकल कारखान्यासमोर आंदोलन केले. या कारखान्याची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली होती. मात्र येथील जमिनीबाबत 1980 पासून विवाद सुरू आहे. 1980 साली जैन बंधूंनी कंपनी सुरू करण्यासाठी कौसार येथील ही जमीन घेतली होती. पुढे न्यायालयाने ही जमीन उत्तर प्रदेश औद्योगिक विकास प्राधिकरणाकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. मात्र राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने अद्याप या जमिनीवरील ताबा सोडलेला नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरी