शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्यांना राहुल गांधींनी दिला मोलाचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 12:54 IST

वास्तवापासून तुटलेल्या आणि व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्या तरुणाईला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोलाचा सल्ला दिला आहे.

पुणे - गेल्या काही काळामध्ये सोशल मीडियाचा विस्तार मोठ्या झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हर्च्युअल दुनियेत वावरणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वास्तवापासून तुटलेल्या आणि व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्या तरुणाईला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोलाचा सल्ला दिला आहे. ज्यांना व्हर्चुअल जगात जगायचे आहे त्यांना जगू दे, पण शेवटी तुम्हाला वास्तवाचा स्वीकार करावाच लागेल. वास्तवापासून तुम्ही पळू शकत नाही, असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुण्यामध्ये पाच हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. यादरम्यान, सोशल मीडिया आणि त्यावर निर्माण झालेलं  व्हर्च्युअल जग तसेच त्यावरून सुरू असलेले राजकारण  याबाबत राहुल गांधी यांना विचारणा करण्यात आली त्यावेळी ते म्हणाले की, ''वास्तवापासून तुम्ही पळू शकत नाही. ज्यांना व्हर्चुअल रियालिटीमध्ये जगायचे आहे, त्यांना जगू द्या. मात्र अखेरीस त्यांना वास्तवाचा स्वीकार करावाच लागेल.'' तसेच द्वेश, क्रोध आणि हिंसा यामुळे कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. झाले तर नुकसानच होते, असा  सल्लाही राहुल गांधी यांनी दिला. 

पुण्यातील महालक्ष्मी लॉन्सवर राहुल गांधींच्या विद्यार्थ्यांशी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. हा राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. हडपसरमधील महालक्ष्मी लॉन्सच्या हॉलबाहेर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांसाठी संगीत-नृत्य कार्यक्रमही झाले. या संवाद कार्यक्रमाला शहरातील काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. तत्पूर्वी, पुण्यातील आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, अमोल कोल्हे, मोहन जोशी यांनी कोरेगाव पार्कमधील हॉटेल वेस्ट इन येथे राहुल गांधींची भेट घेतली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसStudentविद्यार्थी