शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
3
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
4
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
5
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
6
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
7
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
8
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
9
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
10
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
11
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
12
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
13
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
14
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
15
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
16
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
17
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
18
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
19
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
20
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी

"...तर मोहन भागवतांना अटक केली असती"; सरसंघचालकांच्या वक्तव्यावर संतापले राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:20 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संविधानाचा अपमान केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi on Mohan Bhagwat Constitution Remarks: राम मंदिर प्रतिष्ठापणेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. हिंदू तिथीनुसार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं. यानंतरआता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. मोहन भागवत यांनी संविधानाचा अपमान केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काँग्रेसच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राहुल गांधी बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन केलेल्या विधानावर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी त्यांच्यावर तीव्र हल्ला चढवला.  मोहन भागवत यांनी संविधानावर हल्ला केला आहे. हा देशद्रोह आणि संविधानाचा अपमान आहे, असं राहुल गांधी म्हणाले. निवडणूक पारदर्शकतेने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीची आकडेवारी देण्याची जबाबदारी आयोगाची आहे, मात्र ते आम्हाला डेटा देण्यास नकार देत आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.

मोहन भागवतांवर कारवाई झाली असती - राहुल गांधी

"मला वाटते की कालच संघ प्रमुखांनी १९४७ मध्ये भारताला कधीच स्वातंत्र्य मिळाले नाही असं म्हणणं हे अगदी प्रतीकात्मक आहे. ते म्हणाले की, खरे स्वातंत्र्य राम मंदिर बांधले तेव्हाच मिळाले. मोहन भागवत यांनी काल संविधान आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक नसल्याचे सांगतानाच त्यावर हल्ला चढवला. मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य चळवळ आणि राज्यघटनेबद्दल आपले मत राष्ट्राला सांगण्याची हिंमत केली. ते काल जे बोलले ते देशद्रोह आहे कारण ते म्हणाले आमची राज्यघटना अवैध आहे. हा आपल्या देशाचा आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याचा अपमान आहे. हे विधान इतर कोणत्याही देशात केले असते तर भागवतांना अटक करून न्यायालयीन कारवाई झाली असती. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. आणि आपण हे ऐकणे बंद केले पाहिजे," असं राहुल गांधी म्हणाले.

काय म्हणाले मोहन भागवत?

इंदौर येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना 'राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार' प्रदान केल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत बोलत होते. "राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हे भारताचे खरे स्वातंत्र्य आहे. हा दिवस पौष शुक्ल द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे, जो शतकानुशतके बाह्य आक्रमणाने सहन करणाऱ्या भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना याच दिवशी झाली. देश स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि जगाला रस्ता दाखवता यावा यासाठी भारताने स्वतःला जागृत करण्यासाठी राम मंदिर आंदोलन सुरू केले होते. कोणाचा विरोध करण्यासाठी राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केलेली नाही," असं मोहन भागवत म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेस