शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"...तर मोहन भागवतांना अटक केली असती"; सरसंघचालकांच्या वक्तव्यावर संतापले राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:20 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संविधानाचा अपमान केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi on Mohan Bhagwat Constitution Remarks: राम मंदिर प्रतिष्ठापणेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. हिंदू तिथीनुसार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं. यानंतरआता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. मोहन भागवत यांनी संविधानाचा अपमान केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काँग्रेसच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राहुल गांधी बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन केलेल्या विधानावर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी त्यांच्यावर तीव्र हल्ला चढवला.  मोहन भागवत यांनी संविधानावर हल्ला केला आहे. हा देशद्रोह आणि संविधानाचा अपमान आहे, असं राहुल गांधी म्हणाले. निवडणूक पारदर्शकतेने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीची आकडेवारी देण्याची जबाबदारी आयोगाची आहे, मात्र ते आम्हाला डेटा देण्यास नकार देत आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.

मोहन भागवतांवर कारवाई झाली असती - राहुल गांधी

"मला वाटते की कालच संघ प्रमुखांनी १९४७ मध्ये भारताला कधीच स्वातंत्र्य मिळाले नाही असं म्हणणं हे अगदी प्रतीकात्मक आहे. ते म्हणाले की, खरे स्वातंत्र्य राम मंदिर बांधले तेव्हाच मिळाले. मोहन भागवत यांनी काल संविधान आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक नसल्याचे सांगतानाच त्यावर हल्ला चढवला. मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य चळवळ आणि राज्यघटनेबद्दल आपले मत राष्ट्राला सांगण्याची हिंमत केली. ते काल जे बोलले ते देशद्रोह आहे कारण ते म्हणाले आमची राज्यघटना अवैध आहे. हा आपल्या देशाचा आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याचा अपमान आहे. हे विधान इतर कोणत्याही देशात केले असते तर भागवतांना अटक करून न्यायालयीन कारवाई झाली असती. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. आणि आपण हे ऐकणे बंद केले पाहिजे," असं राहुल गांधी म्हणाले.

काय म्हणाले मोहन भागवत?

इंदौर येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना 'राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार' प्रदान केल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत बोलत होते. "राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हे भारताचे खरे स्वातंत्र्य आहे. हा दिवस पौष शुक्ल द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे, जो शतकानुशतके बाह्य आक्रमणाने सहन करणाऱ्या भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना याच दिवशी झाली. देश स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि जगाला रस्ता दाखवता यावा यासाठी भारताने स्वतःला जागृत करण्यासाठी राम मंदिर आंदोलन सुरू केले होते. कोणाचा विरोध करण्यासाठी राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केलेली नाही," असं मोहन भागवत म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेस