शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

बाईक सर्व्हिसिंग ते कामगारांची विचारणा; मोटार मॅकेनिकसोबत राहुल गांधींनी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 15:03 IST

राहुल गांधी दिल्लीतील करोलबाग भागात गेले, त्यांनी स्वतः गाडीची सर्व्हिसिंग केली. यावेळी त्यांनी मेकॅनिक लोकांच्या समस्याही जाणून घेतल्या.

Rahul Gandhi :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा संपल्यानंतरही सामान्य लोकांच्या भेटी सुरुच ठेवल्या आहेत. ते सातत्याने विविध क्षेत्रातील सामान्य लोकांच्या भेटी घेत आहेत. यातच आता राहुल गांधीदिल्लीतील करोलबाग येथील मेकॅनिक मार्केटमध्ये गेले. तिथे त्यांनी गाड्या दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकशी संवाद साधला आणि स्वत: बाईक सर्व्हिसिंगही केली. यासोबतच त्यांनी दुकानांवर काम करणाऱ्या लोकांच्या समस्यांबाबत विचारणा केली. 

राहुल गांधी करोलबागमध्ये बाईक सर्व्हिसिंग करत असताना एका मेकॅनिकने त्यांना लग्नाबाबत विचारणा केली. त्यावर राहुल हसले आणि म्हणाले लवकरच होईल. राहुलने त्या मेकॅनिकलाही तुझे लग्न झाले आहे का, विचारले. बाईक सर्व्हिसिंगनंतर राहुल म्हणाले की, मेकॅनिक लोक काम कसे करतात, त्यांचे आयुष्य किती अवघड असते, हे मला समजून घ्यायचे होते.

ते पुढे म्हणाले की, या लोकांशिवाय कामे होऊ शकत नाही. शेतकऱ्याशिवाय अन्न मिळत नाही. पण लोकांना शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता वाटत नाही. यावर मेकॅनिक म्हणाला की, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही. आम्हीही खूप मेहनत करतो, पण कंपनीचे लोक कधीच येऊन विचारत नाहीत की तुम्ही कसे जगता, कसे कमावता.

राहुलकडे कोणती बाईक आहे?एका मेकॅनिकने राहुल यांना विचारले की, तुमच्याकडे कोणती बाईक आहे, त्यावर राहुल म्हणाले, माझ्याकडे केटीएम 390 आहे. पण, राहुल गांधींनी यावेळी त्यांचे एक दुःखही सांगितले. त्यांना इच्छा असूनही बाईक चालवता येत नाही. त्यांच्या सुरक्षेखातर सेक्युरिटीवाले त्यांना बाईक चालवू देत नाहीत. 

राहुल यांना बाईकबाबत खूप माहिती आहेराहुल गांधी निघून गेल्यावर मेकॅनिक म्हणाले की, राहुल गांधी स्वतः आमच्याकडे आले आणि आमचे जीवन समजून घेतले. महागाई इतकी वाढली आहे की, महिनाभर कमवले तरी घराचे रेशन पूर्ण होत नाही. मुलांचे भविष्य, कपडे, सण, कर्ज, आजारपण, यातून आम्ही बाहेर येऊ शकत नाही. या सर्व गोष्टींची माहिती राहुल यांनी घेतली.  एक मेकॅनिक म्हणाला की, मी इतके नेते पाहिले आहेत, पण कोणीही आमच्या इतके जवळ आले नाही. आम्हाला कोणी भेटायला येत नाही.

भारत जोडो प्रवास सुरूच भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत आहेत आणि त्यांच्या समस्या ऐकत आहेत. यापूर्वी 23 मे रोजी राहुल गांधी दिल्ली ते चंदीगड प्रवासादरम्यान ट्रकमधून प्रवास करताना दिसले होते. राहुल गांधी यांनी ट्रक चालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व समस्या जाणून घेतल्या. कर्नाटक निवडणुकीच्या वेळी ते बंगळुरूमध्ये डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटर चालवताना दिसले होते. राहुल गांधी त्यांच्या अमेरिका दौऱ्यातही ट्रक चालवताना दिसले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राBJPभाजपाdelhiदिल्लीlok sabhaलोकसभा