शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
5
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
6
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
7
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
8
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
9
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
10
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
11
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
12
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
13
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
14
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
15
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
16
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
17
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
18
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
19
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
20
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
Daily Top 2Weekly Top 5

"सारखं आंबेडकर म्हणायची फॅशन आलीय"; शाहांच्या विधानावर राहुल गांधी म्हणाले, "त्रास होणारच कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावरुन राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Rahul Gandhi jibe Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत आक्रमक भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सारखं घेण्याची आता फॅशन झाली आहे. देवाचं इतक्या वेळा नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता असं अमित शाह यांनी म्हटलं. अमित शहांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि विरोधक चांगलेच संतापले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे.

राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान विरोधकांवर तोंडसुख घेत अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला होता. 'आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असं सारखं म्हणणं ही आजकाल विरोधकांत फॅशन झाली आहे. देवाचे एवढे नाव घेतले असते तर सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता, असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं. आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने  केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये आंबेडकरांबद्दल प्रचंड द्वेष असल्याचे या टिप्पणीवरून दिसून येते, असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स पोस्टवरुन अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. "जे मनुस्मृतीला मानतात त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा नक्कीच त्रास होणारच," असं राहुल गांधी यांनी म्हटलं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचे म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केल्याने भाजप आरएसएस तिरंग्याच्या विरोधात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला विरोध केला होता. संघ परिवारातील लोकांना पहिल्या दिवसापासून भारतीय राज्यघटनेच्या जागी मनुस्मृतीची अंमलबजावणी करायची होती, असं खरगे यांनी म्हटलं.

तर काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रभारी जयराम रमेश यांनीही अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन निशाणा साधला. "गृहमंत्र्यांनी ९० मिनिटांचे प्रवचन दिले. पहिली दुरुस्ती (नेहरू सरकारच्या काळात) का आणली गेली याचा उल्लेख त्यांनी केला नाही. जमीनदारी काढण्यासाठी आणलेले कायदे रद्द करण्यात आले म्हणून ते आणले गेले. दुसरे कारण म्हणजे आरक्षण वाचवणे. कारण सर्वोच्च न्यायालयाने मद्रासमध्ये दिलेले आरक्षण रद्द केले होते. अमित शाह यांनी अतिशय घृणास्पद गोष्ट सांगितली आहे. यावरून भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड द्वेष असल्याचे दिसून येतो," असं जयराम रमेश यांनी म्हटलं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा