शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना 'ती' टीका भोवली; मोदी सरकारऐवजी काँग्रेसचं जाळ्यात फसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 19:46 IST

मात्र मोदी सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी हे विसरले की हे संपूर्ण प्रकरण डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळातलं आहे.

नवी दिल्ली - महिला अधिकाऱ्यांना स्थायी पोस्टिंग देण्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करुन नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मात्र अपुऱ्या माहितीच्या आधारे मोदी सरकारवर टीका केल्यामुळे राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्षच अडचणीत आल्याचं दिसत आहे. राहुल गांधींच्या ट्विटमुळे तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरच निशाणा साधल्याचा टोला त्यांना सहन करावा लागत आहे. 

सुप्रीम कोर्टाने लष्करातील महिला अधिकाऱ्यांसाठी कायमची पोस्टिंग(स्थायी कमिशन) देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. महिलांना कायमस्वरूपीची पोस्टिंग मिळाली पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. केंद्र सरकारनं दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. महिलांना स्थायी पोस्टिंग देता येणार नाही, असा मोदी सरकारचा तर्क होता. महिलांना कायमची पोस्टिंग दिल्यास त्याचा शत्रू राष्ट्र लाभ घेऊ शकतो. तसेच पुरुषांनाही त्यांना सारखे सारखे आदेश देण्यात अडचणी येऊ शकतात, असा युक्तिवाद मोदी सरकारनं केला होता.  

यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, सरकारने सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळी युक्तिवाद करताना सैन्यातील महिला स्थायी पोस्टिंग करु शकत नाही, कारण ते पुरुषांसारखे कामकाज करु शकणार नाही. त्यामुळे भारतीय महिलांचा हा अपमान आहे. मी भारतीय महिलांच्या बाजूने आहे. भाजपा सरकारच्या युक्तिवादाला चुकीचं ठरवत कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो असं त्यांनी सांगितले. 

मात्र मोदी सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी हे विसरले की हे संपूर्ण प्रकरण डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळातलं आहे.    मनमोहन सिंग सरकारने ६ जुलै २०१० रोजी सुप्रीम कोर्टात दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध धाव घेतली होती. दिल्ली हायकोर्टाने सैन्यातील महिला अधिकाऱ्यांना स्थायी पोस्टिंग देण्याचे आदेश दिले होते. १२ मार्च २०१० रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिला. सरकारने या निर्णयाचा पुर्नविचार करावा अशी मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. 

राहुल गांधींच्या या ट्विटवर हायकोर्टाचे वकील नवदीप सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, अशा प्रकरणात कोर्टाच्या निर्णयावर राजकारण होऊ नये, त्याचसोबत दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात तत्कालीन सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सध्याचं सरकार तेव्हा नव्हतं. २०१० मध्ये केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएचं सरकार होतं अशी आठवण त्यांनी राहुल गांधींना करुन दिली. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManmohan Singhमनमोहन सिंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय