शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

"आधी कोणाला मारायचं असतं तर..."; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:58 IST

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याचा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PM Modi Security Breach : नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानले.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे रोड शो देखील केला. मात्र आता पंतप्रधान मोदींच्या ताफ्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक सुरक्षा कर्मचारी त्याच्या वाहनावरुन काहीतरी वस्तू बाजूला करत असल्याचे दिसत आहे. काँग्रेससह अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर चप्पल फेकली असल्याचे म्हणत हा व्हिडीओ शेअर केला होता. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी या घटनेंवरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकण्यात आली होती जी त्यांच्या एसयूव्हीच्या बोनेटवर पडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. सोशल मीडियावर लोक याला चप्पल म्हणत आहेत, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारे याची पुष्टी झालेली नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेतसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी सांगितले की, वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेटप्रूफ वाहनावर चप्पल फेकण्यात आल्याचे म्हटलं. व्हिडिओमध्ये एक सुरक्षा कर्मचारी बोनेटमधून चप्पल उचलून फेकताना दिसत आहे. 

या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं आहे. "आता देशात पंतप्रधान मोदींना कोणीही घाबरत नाही. पूर्वी ५६ इंचाची असलेली छाती आता ३२ ची झाली आहे. आता मोदींना मानसिकरित्या मोठी अडचण होणार आहे. कारण लोकांना घाबरवून काम करुन घेण्याची त्यांची पद्धत आहे. वाराणसीमध्ये कोणीतरी चप्पल मारली. निवडणुकीच्या आधी कोणाला मारायचं असतं तर तो घाबरला असता. त्यांच्या पक्षातही अडचणी आहेत, त्यांच्या मातृसंघटनेतही अडचणी आहेत. त्यामुळे मला असे म्हणायचे आहे की नरेंद्र मोदींची संकल्पना विरोधकांनी मोडून काढली. दुसरीकडे आता खूप प्रबळ विरोधक आहेत. ही खूप मनोरंजक वेळ आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

युजीसी नीट परीक्षा रद्द केल्यावरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. "भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हजारो लोकांनी पेपर फुटीबाबतच्या त्यांच्या तक्रारी माझ्याशी शेअर केल्या. मोदीजींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचे बोलले जात होते. पण काही कारणांमुळे नरेंद्र मोदी भारतात पेपरफुटी थांबवू शकले नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसVaranasiवाराणसी