शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"आधी कोणाला मारायचं असतं तर..."; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:58 IST

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याचा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PM Modi Security Breach : नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानले.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे रोड शो देखील केला. मात्र आता पंतप्रधान मोदींच्या ताफ्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक सुरक्षा कर्मचारी त्याच्या वाहनावरुन काहीतरी वस्तू बाजूला करत असल्याचे दिसत आहे. काँग्रेससह अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर चप्पल फेकली असल्याचे म्हणत हा व्हिडीओ शेअर केला होता. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी या घटनेंवरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकण्यात आली होती जी त्यांच्या एसयूव्हीच्या बोनेटवर पडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. सोशल मीडियावर लोक याला चप्पल म्हणत आहेत, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारे याची पुष्टी झालेली नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेतसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी सांगितले की, वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेटप्रूफ वाहनावर चप्पल फेकण्यात आल्याचे म्हटलं. व्हिडिओमध्ये एक सुरक्षा कर्मचारी बोनेटमधून चप्पल उचलून फेकताना दिसत आहे. 

या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं आहे. "आता देशात पंतप्रधान मोदींना कोणीही घाबरत नाही. पूर्वी ५६ इंचाची असलेली छाती आता ३२ ची झाली आहे. आता मोदींना मानसिकरित्या मोठी अडचण होणार आहे. कारण लोकांना घाबरवून काम करुन घेण्याची त्यांची पद्धत आहे. वाराणसीमध्ये कोणीतरी चप्पल मारली. निवडणुकीच्या आधी कोणाला मारायचं असतं तर तो घाबरला असता. त्यांच्या पक्षातही अडचणी आहेत, त्यांच्या मातृसंघटनेतही अडचणी आहेत. त्यामुळे मला असे म्हणायचे आहे की नरेंद्र मोदींची संकल्पना विरोधकांनी मोडून काढली. दुसरीकडे आता खूप प्रबळ विरोधक आहेत. ही खूप मनोरंजक वेळ आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

युजीसी नीट परीक्षा रद्द केल्यावरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. "भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हजारो लोकांनी पेपर फुटीबाबतच्या त्यांच्या तक्रारी माझ्याशी शेअर केल्या. मोदीजींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचे बोलले जात होते. पण काही कारणांमुळे नरेंद्र मोदी भारतात पेपरफुटी थांबवू शकले नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसVaranasiवाराणसी