शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"आधी कोणाला मारायचं असतं तर..."; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:58 IST

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याचा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PM Modi Security Breach : नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानले.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे रोड शो देखील केला. मात्र आता पंतप्रधान मोदींच्या ताफ्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक सुरक्षा कर्मचारी त्याच्या वाहनावरुन काहीतरी वस्तू बाजूला करत असल्याचे दिसत आहे. काँग्रेससह अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर चप्पल फेकली असल्याचे म्हणत हा व्हिडीओ शेअर केला होता. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी या घटनेंवरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकण्यात आली होती जी त्यांच्या एसयूव्हीच्या बोनेटवर पडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. सोशल मीडियावर लोक याला चप्पल म्हणत आहेत, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारे याची पुष्टी झालेली नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेतसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी सांगितले की, वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेटप्रूफ वाहनावर चप्पल फेकण्यात आल्याचे म्हटलं. व्हिडिओमध्ये एक सुरक्षा कर्मचारी बोनेटमधून चप्पल उचलून फेकताना दिसत आहे. 

या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं आहे. "आता देशात पंतप्रधान मोदींना कोणीही घाबरत नाही. पूर्वी ५६ इंचाची असलेली छाती आता ३२ ची झाली आहे. आता मोदींना मानसिकरित्या मोठी अडचण होणार आहे. कारण लोकांना घाबरवून काम करुन घेण्याची त्यांची पद्धत आहे. वाराणसीमध्ये कोणीतरी चप्पल मारली. निवडणुकीच्या आधी कोणाला मारायचं असतं तर तो घाबरला असता. त्यांच्या पक्षातही अडचणी आहेत, त्यांच्या मातृसंघटनेतही अडचणी आहेत. त्यामुळे मला असे म्हणायचे आहे की नरेंद्र मोदींची संकल्पना विरोधकांनी मोडून काढली. दुसरीकडे आता खूप प्रबळ विरोधक आहेत. ही खूप मनोरंजक वेळ आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

युजीसी नीट परीक्षा रद्द केल्यावरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. "भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हजारो लोकांनी पेपर फुटीबाबतच्या त्यांच्या तक्रारी माझ्याशी शेअर केल्या. मोदीजींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचे बोलले जात होते. पण काही कारणांमुळे नरेंद्र मोदी भारतात पेपरफुटी थांबवू शकले नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसVaranasiवाराणसी