शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Rahul Gandhi: राहुल गांधींवर ईडीची मोठी कारवाई होऊ शकते काय? काॅंग्रेसमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 06:58 IST

Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई होऊ शकते काय, याची काळजी पक्षातील नेत्यांना लागली आहे.

- आदेश रावल  नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई होऊ शकते काय, याची काळजी पक्षातील नेत्यांना लागली आहे. उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात राहुल गांधी म्हणाले होते की, माझ्यावर भारतमातेचे एक रुपयाचेही कर्ज नाही. हेच विधान या घटनाक्रमामागचे मोठे कारण आहे, असे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांची प्रामाणिक प्रतिमा ईडीच्या माध्यमातून खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेत्यांचे असे म्हणणे आहे की, भाजप अथवा डावे पक्ष ज्याप्रमाणे आपले वृत्तपत्र चालवितात त्याप्रमाणेच नॅशनल हेराल्ड हे काँग्रेस पक्षाचे वृत्तपत्र होते. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जर भाजपचे वृत्तपत्र तोट्यात गेले तर ते त्याला वाचविणार की नाही? राहुल गांधी यांनीही तेच केले. राहुल गांधी यांच्यावर मोठ्या कारवाईच्या शक्यतेची चर्चा आहे. काँग्रेस नेतृत्वाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशिवाय सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि संसद सदस्यांना दिल्लीत थांबण्याचे निर्देश दिले आहेत. अग्निपथ योजनेवरून काँग्रेस भलेही दिल्लीत जंतरमंतरवर निदर्शने करीत असेल; पण राहुल गांधी यांच्यावर मोठ्या कारवाईच्या चर्चेमुळे काँग्रेस काळजीत आहे. 

काय वाटते काँग्रेसच्या नेत्यांना ?राहुल गांधी यांना अटक करण्याची चूक सरकार करणार नाही. कारण, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो, असे काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. पण, नेत्यांना अशी काळजी आहे की, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याप्रमाणे कारवाई होऊ नये. 

राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशीकाँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने उद्या, मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलाविले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्यांची ४० तास चौकशी केली. नॅशनल हेराॅल्ड वृत्तपत्राशी संबंधित आणखी महत्वाचे प्रश्न त्यांना विचारणार असल्याचे कळते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेसPoliticsराजकारण