शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

Rahul Gandhi: राहुल गांधींवर ईडीची मोठी कारवाई होऊ शकते काय? काॅंग्रेसमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 06:58 IST

Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई होऊ शकते काय, याची काळजी पक्षातील नेत्यांना लागली आहे.

- आदेश रावल  नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई होऊ शकते काय, याची काळजी पक्षातील नेत्यांना लागली आहे. उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात राहुल गांधी म्हणाले होते की, माझ्यावर भारतमातेचे एक रुपयाचेही कर्ज नाही. हेच विधान या घटनाक्रमामागचे मोठे कारण आहे, असे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांची प्रामाणिक प्रतिमा ईडीच्या माध्यमातून खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेत्यांचे असे म्हणणे आहे की, भाजप अथवा डावे पक्ष ज्याप्रमाणे आपले वृत्तपत्र चालवितात त्याप्रमाणेच नॅशनल हेराल्ड हे काँग्रेस पक्षाचे वृत्तपत्र होते. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जर भाजपचे वृत्तपत्र तोट्यात गेले तर ते त्याला वाचविणार की नाही? राहुल गांधी यांनीही तेच केले. राहुल गांधी यांच्यावर मोठ्या कारवाईच्या शक्यतेची चर्चा आहे. काँग्रेस नेतृत्वाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशिवाय सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि संसद सदस्यांना दिल्लीत थांबण्याचे निर्देश दिले आहेत. अग्निपथ योजनेवरून काँग्रेस भलेही दिल्लीत जंतरमंतरवर निदर्शने करीत असेल; पण राहुल गांधी यांच्यावर मोठ्या कारवाईच्या चर्चेमुळे काँग्रेस काळजीत आहे. 

काय वाटते काँग्रेसच्या नेत्यांना ?राहुल गांधी यांना अटक करण्याची चूक सरकार करणार नाही. कारण, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो, असे काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. पण, नेत्यांना अशी काळजी आहे की, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याप्रमाणे कारवाई होऊ नये. 

राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशीकाँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने उद्या, मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलाविले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्यांची ४० तास चौकशी केली. नॅशनल हेराॅल्ड वृत्तपत्राशी संबंधित आणखी महत्वाचे प्रश्न त्यांना विचारणार असल्याचे कळते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेसPoliticsराजकारण