शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Rahul Gandhi : "थोडासा दबाव पडताच पलटले..."; राहुल गांधींचा नितीश कुमारांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 16:56 IST

Rahul Gandhi : इंडिया आघाडीला धक्का बसल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्याबद्दल विधान केलं आहे.

बिहारमधील राजकीय घडामोडींमुळे इंडिया आघाडीला धक्का बसल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्याबद्दल विधान केलं आहे. त्यांनी नाव न घेता बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, थोडासा दबाव पडताच त्यांनी (नितीश कुमार) यू-टर्न घेतला. पण दबाव का? कारण आम्ही जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडत आहोत. भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये दाखल झाली आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, "अखिलेशजी यांचं भाषण सुरू असताना बघेलजी यांनी मला एक विनोद सांगितला. तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल एक विनोद आहे. आपले मुख्यमंत्री शपथ घेण्यासाठी राज्यपालांच्या ठिकाणी गेले. मोठा जल्लोष झाला. तेथे भाजपा नेते आणि राज्यपाल बसले होते. मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाची शपथ घेतली जाते. त्यानंतर ते सीएम हाऊसकडे रवाना झाले."

"कारमध्ये त्यांना आपली शाल राज्यपालांच्या घरी विसरल्याचं लक्षात येतं. यावर ते ड्रायव्हरला राज्यपालांच्या घरी परत जाण्यास सांगतात. राज्यपालांकडे गेले आणि दरवाजा उघडताच राज्यपाल म्हणाले, 'अरे, तुम्ही इतक्या लवकर आलात का?' अशी बिहारची अवस्था आहे. थोडासा दबाव येताच यू-टर्न घेतात."

"नितीशजी का अडकले ते समजून घ्या. मी त्यांना थेट सांगितलं की तुम्हाला बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना करावी लागेल. आरजेडीसह नितीशजींनी सर्वेक्षण करण्याचा आग्रह धरला. मात्र भाजपा घाबरला. ते या योजनेच्या विरोधात आहेत. नितीशजी अडकले आणि भाजपाने त्यांना पळून जाण्यासाठी मागच्या दाराने जागा दिली. लोकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमच्या आघाडीची आहे आणि त्यासाठी आम्हाला नितीशजींची गरज नाही" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNitish Kumarनितीश कुमारcongressकाँग्रेसBJPभाजपा