शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
4
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
5
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
6
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
7
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
8
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
9
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
10
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
11
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
12
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
13
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
14
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
15
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
16
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
17
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
18
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
19
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
20
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:42 IST

Rahul Gandhi Bihar: 'भाजप तुमच्याकडून अधिकार हिसकावून घेऊ इच्छिते. ६५ लाख मते कापली गेली. त्यात एकाही श्रीमंत माणसाचे नाव नाही.'

Rahul Gandhi Bihar: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीच्या मतदार हक्क यात्रेतून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव सातत्याने केंद्रातील भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. आज(दि.२८) त्यांनी सीतामढी येथे जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचे गंभीर आरोप केले. 

तुमचे रेशन कार्ड घेतील...जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की, भाजपवाले बिहारमधील निवडणुका चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक आधी तुमचे मत घेतील, नंतर तुमचे रेशन कार्ड घेतील आणि नंतर आधारही घेतील. म्हणूनच आम्ही मतदार हक्क यात्रा सुरू केली आहे. निवडणूक आयुक्तांना हे माहित असले पाहिजे की, बिहारमधील लोक हुशार आहेत आणि एकही मत चोरू देणार नाहीत.

तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न...राहुल पुढे म्हणतात, मी दलित बांधवांना सांगू इच्छितो की, स्वातंत्र्यापूर्वी तुमची काय अवस्था होती ते आठवा? तुम्हाला मारहाण झाली, तुम्हाला अस्पृश्य म्हटले गेले. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले. भाजप तुमच्याकडून अधिकार हिसकावून घेऊ इच्छिते. ६५ लाख मते कापली गेली. त्यात एकाही श्रीमंत माणसाचे नाव नाही. ते गरिबांची मते चोरत आहेत. ते तुमचा आवाज दाबू इच्छितात. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. तुमचा आवाज त्यांना दाबू देणार नाहीत. 

भाजप-आरएसएस मत चोर...तुम्ही या यात्रेत तुमची सर्व शक्ती पणाला लावली आहे. लहान मुले येत आहेत, माझ्या कानात कुजबुजत आहेत की, नरेंद्र मोदी मते चोरतात. कर्नाटकमध्ये आम्ही भाजपने मते चोरल्याचे पुरावे दाखवले. आतापर्यंत मी फक्त कर्नाटकचा पुरावा दिला आहे. येणाऱ्या काळात मी लोकसभा निवडणुका आणि हरियाणा निवडणुकीचे पुरावे देईन. आम्ही हे सिद्ध करू की, भाजप आणि आरएसएस मते चोरुन निवडणुका जिंकतात, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 

नरेंद्र मोदी राजेशाही स्थापित करू इच्छितात: तेजस्वी यादवजाहीर सभेला संबोधित करताना तेजस्वी यादव म्हणाले, नितीश कुमार, जे सतत त्यांची भूमिका बदलतात, ते बिहारवर राज्य करण्याच्या स्थितीत नाहीत. बिहारच्या लोकांना रोजगार आणि नोकऱ्यांची गरज आहे. बिहार लोकशाहीचे जन्मस्थान आहे. भाजप आणि त्यांचे सहयोगी, निवडणूक आयोग या भूमीतून लोकशाही संपवू इच्छितात. ते केवळ तुमचा मतदानाचा अधिकारच नाही, तर तुमचे अस्तित्वही संपवू इच्छितात. नरेंद्र मोदीजी लोकशाही नष्ट करून 'राजेशाही' स्थापित करू इच्छितात, अशी टीका त्यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा