शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:42 IST

Rahul Gandhi Bihar: 'भाजप तुमच्याकडून अधिकार हिसकावून घेऊ इच्छिते. ६५ लाख मते कापली गेली. त्यात एकाही श्रीमंत माणसाचे नाव नाही.'

Rahul Gandhi Bihar: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीच्या मतदार हक्क यात्रेतून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव सातत्याने केंद्रातील भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. आज(दि.२८) त्यांनी सीतामढी येथे जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचे गंभीर आरोप केले. 

तुमचे रेशन कार्ड घेतील...जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की, भाजपवाले बिहारमधील निवडणुका चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक आधी तुमचे मत घेतील, नंतर तुमचे रेशन कार्ड घेतील आणि नंतर आधारही घेतील. म्हणूनच आम्ही मतदार हक्क यात्रा सुरू केली आहे. निवडणूक आयुक्तांना हे माहित असले पाहिजे की, बिहारमधील लोक हुशार आहेत आणि एकही मत चोरू देणार नाहीत.

तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न...राहुल पुढे म्हणतात, मी दलित बांधवांना सांगू इच्छितो की, स्वातंत्र्यापूर्वी तुमची काय अवस्था होती ते आठवा? तुम्हाला मारहाण झाली, तुम्हाला अस्पृश्य म्हटले गेले. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले. भाजप तुमच्याकडून अधिकार हिसकावून घेऊ इच्छिते. ६५ लाख मते कापली गेली. त्यात एकाही श्रीमंत माणसाचे नाव नाही. ते गरिबांची मते चोरत आहेत. ते तुमचा आवाज दाबू इच्छितात. आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. तुमचा आवाज त्यांना दाबू देणार नाहीत. 

भाजप-आरएसएस मत चोर...तुम्ही या यात्रेत तुमची सर्व शक्ती पणाला लावली आहे. लहान मुले येत आहेत, माझ्या कानात कुजबुजत आहेत की, नरेंद्र मोदी मते चोरतात. कर्नाटकमध्ये आम्ही भाजपने मते चोरल्याचे पुरावे दाखवले. आतापर्यंत मी फक्त कर्नाटकचा पुरावा दिला आहे. येणाऱ्या काळात मी लोकसभा निवडणुका आणि हरियाणा निवडणुकीचे पुरावे देईन. आम्ही हे सिद्ध करू की, भाजप आणि आरएसएस मते चोरुन निवडणुका जिंकतात, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 

नरेंद्र मोदी राजेशाही स्थापित करू इच्छितात: तेजस्वी यादवजाहीर सभेला संबोधित करताना तेजस्वी यादव म्हणाले, नितीश कुमार, जे सतत त्यांची भूमिका बदलतात, ते बिहारवर राज्य करण्याच्या स्थितीत नाहीत. बिहारच्या लोकांना रोजगार आणि नोकऱ्यांची गरज आहे. बिहार लोकशाहीचे जन्मस्थान आहे. भाजप आणि त्यांचे सहयोगी, निवडणूक आयोग या भूमीतून लोकशाही संपवू इच्छितात. ते केवळ तुमचा मतदानाचा अधिकारच नाही, तर तुमचे अस्तित्वही संपवू इच्छितात. नरेंद्र मोदीजी लोकशाही नष्ट करून 'राजेशाही' स्थापित करू इच्छितात, अशी टीका त्यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा