शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

Rahul Gandhi : Video - डोक्याला टॉवेल बांधून राहुल गांधींचा देसी अंदाज; शेतकऱ्यांशी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 13:37 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पूर्णियातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधील सीमांचलमध्ये पोहोचली आहे. पूर्णियामध्ये राहुल गांधींचा देसी अंदाज पाहायला मिळाला. डोक्याला टॉवेल बांधून खाटेवर बसल्यानंतर राहुल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी पूर्णियातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, "शेतकऱ्यांना चारही बाजूंनी घेरलं जात आहे. तुमची जमीन हिसकावून घेतली जात आहे. तुमच्याकडून जमीन हिसकावून अदानीसारख्या मोठ्या उद्योगपतींना भेट म्हणून दिली जाते. खतं, बियाणांचा प्रश्न आला की तुमच्यावर दबाव आणला जातो आणि तुमचा पैसा हिसकावला जातो."

"पंतप्रधान मोदींनी सर्वात मोठं काम करण्याचा प्रयत्न केला - त्यांनी तीन काळे कायदे आणले आणि जे तुमचे होते ते तुमच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. देशातील तमाम शेतकरी त्या विरोधात उभा राहिला, मागे हटला नाही. शेतकरी हा देशाचा कणा आहे असं मला वाटतं. अब्जाधीशांचे 14 लाख कोटी रुपये माफ झाले आहेत मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालं नाही. "

सीमांचलमध्ये आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी काँग्रेस आज पूर्णिया येथील रंगभूमी मैदानावर एक मोठी रॅली काढणार आहे. सीमांचल हे बिहारमधील मुस्लिमबहुल क्षेत्र असून पूर्णिया, अररिया, कटिहार, किशनगंज हे चार जिल्हे पूर्णिया आयुक्तालयाच्या अंतर्गत आहेत.

काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, पूर्णिया रॅलीसाठी नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, परंतु आता त्यांनी इंडिया आघाडीशी संबंध तोडून एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच बिहारच्या दौऱ्यावर येत आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसFarmerशेतकरी