शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Rahul Gandhi : Video - डोक्याला टॉवेल बांधून राहुल गांधींचा देसी अंदाज; शेतकऱ्यांशी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 13:37 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पूर्णियातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधील सीमांचलमध्ये पोहोचली आहे. पूर्णियामध्ये राहुल गांधींचा देसी अंदाज पाहायला मिळाला. डोक्याला टॉवेल बांधून खाटेवर बसल्यानंतर राहुल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी पूर्णियातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, "शेतकऱ्यांना चारही बाजूंनी घेरलं जात आहे. तुमची जमीन हिसकावून घेतली जात आहे. तुमच्याकडून जमीन हिसकावून अदानीसारख्या मोठ्या उद्योगपतींना भेट म्हणून दिली जाते. खतं, बियाणांचा प्रश्न आला की तुमच्यावर दबाव आणला जातो आणि तुमचा पैसा हिसकावला जातो."

"पंतप्रधान मोदींनी सर्वात मोठं काम करण्याचा प्रयत्न केला - त्यांनी तीन काळे कायदे आणले आणि जे तुमचे होते ते तुमच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. देशातील तमाम शेतकरी त्या विरोधात उभा राहिला, मागे हटला नाही. शेतकरी हा देशाचा कणा आहे असं मला वाटतं. अब्जाधीशांचे 14 लाख कोटी रुपये माफ झाले आहेत मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालं नाही. "

सीमांचलमध्ये आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी काँग्रेस आज पूर्णिया येथील रंगभूमी मैदानावर एक मोठी रॅली काढणार आहे. सीमांचल हे बिहारमधील मुस्लिमबहुल क्षेत्र असून पूर्णिया, अररिया, कटिहार, किशनगंज हे चार जिल्हे पूर्णिया आयुक्तालयाच्या अंतर्गत आहेत.

काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, पूर्णिया रॅलीसाठी नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, परंतु आता त्यांनी इंडिया आघाडीशी संबंध तोडून एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच बिहारच्या दौऱ्यावर येत आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसFarmerशेतकरी