शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Rahul Gandhi : Video - डोक्याला टॉवेल बांधून राहुल गांधींचा देसी अंदाज; शेतकऱ्यांशी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 13:37 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पूर्णियातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधील सीमांचलमध्ये पोहोचली आहे. पूर्णियामध्ये राहुल गांधींचा देसी अंदाज पाहायला मिळाला. डोक्याला टॉवेल बांधून खाटेवर बसल्यानंतर राहुल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी पूर्णियातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांसाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, "शेतकऱ्यांना चारही बाजूंनी घेरलं जात आहे. तुमची जमीन हिसकावून घेतली जात आहे. तुमच्याकडून जमीन हिसकावून अदानीसारख्या मोठ्या उद्योगपतींना भेट म्हणून दिली जाते. खतं, बियाणांचा प्रश्न आला की तुमच्यावर दबाव आणला जातो आणि तुमचा पैसा हिसकावला जातो."

"पंतप्रधान मोदींनी सर्वात मोठं काम करण्याचा प्रयत्न केला - त्यांनी तीन काळे कायदे आणले आणि जे तुमचे होते ते तुमच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. देशातील तमाम शेतकरी त्या विरोधात उभा राहिला, मागे हटला नाही. शेतकरी हा देशाचा कणा आहे असं मला वाटतं. अब्जाधीशांचे 14 लाख कोटी रुपये माफ झाले आहेत मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालं नाही. "

सीमांचलमध्ये आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी काँग्रेस आज पूर्णिया येथील रंगभूमी मैदानावर एक मोठी रॅली काढणार आहे. सीमांचल हे बिहारमधील मुस्लिमबहुल क्षेत्र असून पूर्णिया, अररिया, कटिहार, किशनगंज हे चार जिल्हे पूर्णिया आयुक्तालयाच्या अंतर्गत आहेत.

काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, पूर्णिया रॅलीसाठी नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, परंतु आता त्यांनी इंडिया आघाडीशी संबंध तोडून एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच बिहारच्या दौऱ्यावर येत आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसFarmerशेतकरी