शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

ही विचारधारेची लढाई, तडजोड नाही; संघ, भाजपवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 09:07 IST

महिला काँग्रेसच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : संघ आणि भाजपच्या विचारधारेशी काँग्रेस कधीही तडजोड करु शकत नाही. यामुळेच काँग्रेस आणि भाजपत विचारधारेचा संघर्ष आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

महिला काँग्रेसच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिला शक्तीचा उल्लेख करुन ते म्हणाले की, लक्ष्मीची शक्ती - रोजगार, दुर्गाची शक्ती - निर्भयता, सरस्वतीची शक्ती - ज्ञान. मात्र, भाजप या सर्व शक्ती हिसकावून घेत आहे. परंतु, आमचा हा संकल्प आहे की, या सर्व शक्ती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लढाई करु. सावरकर आणि गोडसे यांचा उल्लेख करुन राहुल गांधी म्हणाले की, याच विचारसरणीने महात्मा गांधीजींचा जीव घेतला. संघ आणि भाजप हे नकली हिंदू असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

महिला भयभीत

राहुल गांधी म्हणाले की, आज मीडियाही भयभीत आहे. वास्तव हे आहे की, मोदी यांच्याकडे शक्ती नाही. ते भीतीने कापतात. मोदी यांचे पूर्ण जीवन खोटारडे आहे. ते नेहमीच भिऊन पळालेले आहेत. भाजपच्या काळात महिला भयभीत आहेत. संघ आणि भाजपने कोणत्याही महिलेला पंतप्रधान होऊ दिले नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपा