शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

ही विचारधारेची लढाई, तडजोड नाही; संघ, भाजपवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 09:07 IST

महिला काँग्रेसच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : संघ आणि भाजपच्या विचारधारेशी काँग्रेस कधीही तडजोड करु शकत नाही. यामुळेच काँग्रेस आणि भाजपत विचारधारेचा संघर्ष आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 

महिला काँग्रेसच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिला शक्तीचा उल्लेख करुन ते म्हणाले की, लक्ष्मीची शक्ती - रोजगार, दुर्गाची शक्ती - निर्भयता, सरस्वतीची शक्ती - ज्ञान. मात्र, भाजप या सर्व शक्ती हिसकावून घेत आहे. परंतु, आमचा हा संकल्प आहे की, या सर्व शक्ती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लढाई करु. सावरकर आणि गोडसे यांचा उल्लेख करुन राहुल गांधी म्हणाले की, याच विचारसरणीने महात्मा गांधीजींचा जीव घेतला. संघ आणि भाजप हे नकली हिंदू असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

महिला भयभीत

राहुल गांधी म्हणाले की, आज मीडियाही भयभीत आहे. वास्तव हे आहे की, मोदी यांच्याकडे शक्ती नाही. ते भीतीने कापतात. मोदी यांचे पूर्ण जीवन खोटारडे आहे. ते नेहमीच भिऊन पळालेले आहेत. भाजपच्या काळात महिला भयभीत आहेत. संघ आणि भाजपने कोणत्याही महिलेला पंतप्रधान होऊ दिले नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपा