शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

देशात असंच चालत आलंय, राहुल गांधींनीही मान्य केला कंगना राणौतचा 'घराणेशाही'चा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 14:57 IST

गेल्या काही दिवसांपासून देशात 'घराणेशाही' या विषयावर तुफान चर्चा सुरू आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतनं बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावर बोट ठेवून हा मुद्दा नव्यानं चर्चेत आणला होता. आता तर कंगना राणौतचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मान्य केल्याचे दिसत आहे.

मुंबई,दि. 12 - गेल्या काही दिवसांपासून देशात 'घराणेशाही' या विषयावर तुफान चर्चा सुरू आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतनं बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावर बोट ठेवून हा मुद्दा नव्यानं चर्चेत आणला होता. घराणेशाहीवरुन तिनं दिग्दर्शक-निर्माता करण जोहरलाही चांगलेच धारेवर धरले होते. बॉलिवूडमधील घराणेशाहीचा झेंडा मिरवणाऱ्यांमध्ये करणचाच पुढाकार असून तो 'मुव्ही माफिया' आहे, अशी खोचक टीका कंगनानं करण जोहरवर केली होती. आता तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यानिमित्तान घराणेशाहीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. राहुल यांनी असे काही विधान केले आहे की ज्यामुळे त्यांनी स्वतःहून कंगना राणौतनं केलेल्या आरोपांना अनुमोदन दिल्याचे दिसत आहे. शिवाय त्यांनी घराणेशाहीची चर्चा थेट परदेशापर्यंत नेली आहे. अमेरिकेतील बर्केल येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी घराणेशाहीवर भाष्य केले. 'देशात असंच चालत आलंय, देश घराणेशाहीमुळेच चालत आला आहे', असं विधान राहुल गांधी यांनी केले आहे. यावरुन राहुल गांधी यांनीही अभिनेत्री कंगना राणौतनं वारंवार केलेला घराणेशाहीचा आरोप मान्य केल्याचे दिसत आहे.     

घराणेशाहीवर नेमके काय म्हणाले राहुल गांधी?

घराणेशाहीवरुन राहुल गांधी यांनाही टार्गेट केले जाते. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, 'घराणेशाहीवरुन केवळ काँग्रेस पक्षावर निशाणा साधू नये, आमच्या देशात अशाच पद्धतीनं काम चालत आहेल आहे. अखिलेश यादव, एम.के.स्टॅलिन, एवढंच नाही तर राहुल यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीचं उदाहरण देण्यासाठी अभिषेक बच्चनच्याही नावाचा उल्लेख केला. त्यामुळे घराणेशाहीसंदर्भात मी काहीही करु शकत नाही, असेही पुढे ते म्हणालेत.  आता तर मुकेश अंबानी यांच्यानंतर इन्फोसिसमध्येही घराणेशाही दिसून येत असल्याचं त्यांनी विधान केले. 

BJPची लोकं माझ्याविरोधात अजेंडा चालवत आहेत - राहुल गांधीराहुल गांधी यांनी यावेळी असेही म्हटले की, भाजपामधील काही जण केवळ कम्प्युटरसमोर बसून माझ्याविरोधात  अजेंडा चालवत आहेत. मी मूर्ख आहे, मी असा आहे, मी तसा आहे, अशा पद्धतीनं माझ्याविरोधी ते अजेंडा राबवत आहेत. आता देशात काही मंत्र्यांमध्ये बोलणी होऊन कायदे बनवले जात आहेत, मात्र जर काँग्रेसची सत्ता आली तर जनतेशी संवाद साधून आम्ही कायदे बनवू. आता देशाची संसद नाही तर केवळ पीएमओ मजबूत आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  

नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम वक्ते

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा उत्तम वक्ते आहेत, अशी कबुलीही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. मात्र स्तुती करण्याच्या बहाण्याने त्यांनी मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही.  'पंतप्रधान मोदींकडे काही कौशल्यं आहेत. नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम वक्ते आहेत', असं राहुल गांधी सुरुवातीला म्हटले. नंतर 'गर्दीतील तीन ते चार वेगवेगळ्या गटांपर्यंत आपला संदेश कसा पोहोचवायचा हे मोदींना चांगलंच माहिती आहे. आपला संदेश पोहोचवण्याची त्यांची क्षमता प्रभावी आहे', असंही राहुल गांधी म्हणालेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKangana Ranautकंगना राणौत