शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Rafale Deal : राहुल गांधी पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत - रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 17:40 IST

गांधी कुटुंबच भ्रष्टाचाराचे जनक असून राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेशी आणखी खेळू नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे बिनबुडाचे आरोप करत असून त्यांच्याच सरकारच्या काळात रिलायन्सशी प्राथमिक स्वरुपाचा करार करण्यात आला होता. गांधी कुटुंबच भ्रष्टाचाराचे जनक असून राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेशी आणखी खेळू नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री  रविशंकर प्रसाद यांनी केले. तसेच राहुल गांधी राफेल कराराची माहिती जगजाहीर करून पाकिस्तानची मदत करू इच्छित आहेत, असा गंभीर आरोपही प्रसाद यांनी केला.

राहुल गांधी यांनी आज दुपारी केलेल्या आरोपांवर भाजपकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 2012 मध्ये रिलायन्स आणि डसॉल्टच्या काराराबाबत छापून आलेले वृत्तही दाखविले. ते म्हणाले की, 2001 ला नव्या विमानांबाबत सांगितले गेले. 28 ऑगस्ट 2007 ला डसॉल्ट एव्हीएशन आणि आणखी एका कंपनीने निविदा भरल्या. जानेवारी 2012 मध्ये 8 वर्षांनंतर डसॉल्टला निवडले. सहा महिन्यांनी या कराराला पुन्हा परिक्षण करण्यास सांगितले. हवाई दल सारखे सांगत होते, विमाने मिळायला हवीत. याचे राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे. 2012 मध्येच रिलायन्सशी एमओयू झाला होता. तेव्हा रिलायन्सशी चर्चा झाली होती. तेव्हा आमचे सरकार नव्हते. राहुल गांधी यांच्याच सरकारच्या काळात हा करार झाला. याबाबतची वृत्तेही छापून आली होती. आता राहूल गांधी यावर आवाज उठवत आहेत. अंबानी परिवारामध्ये झालेल्या फाटाफुटीशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. 

शस्त्रास्त्रांशिवाय लढाऊ विमानाचा उपयोग काय?10 एप्रिल 2015 ते 2016 दरम्यान हवाई दलाच्या चिंतेला पाहून हा राफेल करार करण्यात आला. 36 हा आकडा कशासाठी? तर बाकीची विमाने देशातच बनतील. वायुदलाला तात्काळ विमाने मिळतील. विमान दिल्ली ते मुंबई जाईल. परंतू हे विमान फिरण्यासाठी नाही, तर युद्धासाठी आहे. यामुळे या विमानावर शस्त्रास्त्रे लावली जातील. त्याला खर्च येणार आहे. युपीए सरकारने करार केलेल्या शस्त्रास्त्रांशिवाय विमानांपेक्षा 9 टक्क्यांनी कमी किंमत तर शस्त्रांसह विमानाची 20 टक्के किंमत ठरविण्यात आली आहे. राहुल गांधी यांना शिकविण्याची गरज आहे. कारण त्यांच्या पक्षातील लोक त्यांना शिकवत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

 

राहुल गांधी यांनी आधी एकच किंमत ठरवावीराहुल गांधी ज्या किंमतीचा उल्लेख केला आहे. त्या किंमती आजपर्यंत पाहिलेल्या नाहीत. खेळण्यातले विमान खरेदी करत नाही आहोत. राहुल हे त्यांच्या सरकारने पाचशे ते 700 कोटी किंमत ठरविल्याचे सांगत आहेत. हे आकडे वेगवेगळे आहेत. यामुळे त्यांनी आधी अभ्यास करावा, असा टोलाही प्रसाद यांनी लगावला. राफेलबाबत माहिती देऊ शकत नाही, कारण चीन आणि पाकिस्तानला याची माहिती मिळेल.

रिलायन्सला फ्रान्सच्या कंपनीने निवडलेकरार सरकारने केला. परंतू, भारतात त्यांचा कोण सहकारी असावा हे फ्रान्सच्या कंपनीनेच ठरविलेले आहे. यासंबंधीचे वक्तव्य फ्रान्स सरकारने आणि डसॉल्ट कंपनीनेही केले आहे. यामुळे मोदी किंवा भारत सरकारचा याच्याशी संबंध कसा येऊ शकतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

रिलायन्सच नाही अन्य सहा कंपन्या करारातदेशातील केवळ रिलायन्सच नाही, तर महिंद्रासह सहा कंपन्यांशी करार झाले आहेत. विमानासाठी लागणारे सुटे भाग याच कंपन्या बनविणार आहेत. याचबरोबर अन्य 100 कंपन्यांशीही बोलणी सुरु आहेत. राहुल गांधी यांना रोजगार उपलब्ध झालेले नको आहेत का? असाही सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीFranceफ्रान्सBJPभाजपाcongressकाँग्रेस