शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

राफेल : सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका; सरकारकडून खोटी माहिती दिल्याचा शौरी, भूषण, सिन्हा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 04:55 IST

राफेल व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्व जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या.

नवी दिल्ली : ३६ राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारामध्ये कोणताही घोटाळा न झाल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला क्लीन चिट दिली होती. पण १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारी एक याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी तसेच अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.राफेल व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्व जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. राफेल विमानांची खरेदी देशासाठी आवश्यक असल्याचे न्यायालयाने या निकालात म्हटले आहे. राफेलच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेससह काही विरोधी पक्ष सरसावले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत तो प्रचारातील मुख्य मुद्दा बनविण्याचाही या पक्षांचा विचार होता. मात्र, या निकालामुळे या पक्षांची मोठी राजकीय अडचण झाली. सिन्हा, शौरी, भूषण यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, राफेलच्या खरेदीत अनेक उणिवा आहेत. केंद्र सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा. या याचिकेची खुली सुनावणी व्हावी, असेही या तिघांनी म्हटले आहे.मोदी यांच्यावर आरोपकाँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राफेल व्यवहार करताना अनेक नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. त्यांची नोंद ज्या फायलींमध्ये आहे त्या माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ताब्यात आहेत. या फायली लपवून का ठेवण्यात येत आहेत, असाही सवाल त्यांनी केला.राफेलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच थेट आरोप झाले आहेत. मात्र, त्याचा इन्कार मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत करून मोदी पुन्हा एकदा खोटे बोलले आहेत.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलCourtन्यायालय