शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

राफेल : सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका; सरकारकडून खोटी माहिती दिल्याचा शौरी, भूषण, सिन्हा यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 04:55 IST

राफेल व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्व जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या.

नवी दिल्ली : ३६ राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारामध्ये कोणताही घोटाळा न झाल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला क्लीन चिट दिली होती. पण १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारी एक याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी तसेच अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.राफेल व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्व जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. राफेल विमानांची खरेदी देशासाठी आवश्यक असल्याचे न्यायालयाने या निकालात म्हटले आहे. राफेलच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेससह काही विरोधी पक्ष सरसावले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत तो प्रचारातील मुख्य मुद्दा बनविण्याचाही या पक्षांचा विचार होता. मात्र, या निकालामुळे या पक्षांची मोठी राजकीय अडचण झाली. सिन्हा, शौरी, भूषण यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, राफेलच्या खरेदीत अनेक उणिवा आहेत. केंद्र सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा. या याचिकेची खुली सुनावणी व्हावी, असेही या तिघांनी म्हटले आहे.मोदी यांच्यावर आरोपकाँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राफेल व्यवहार करताना अनेक नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. त्यांची नोंद ज्या फायलींमध्ये आहे त्या माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ताब्यात आहेत. या फायली लपवून का ठेवण्यात येत आहेत, असाही सवाल त्यांनी केला.राफेलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच थेट आरोप झाले आहेत. मात्र, त्याचा इन्कार मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत करून मोदी पुन्हा एकदा खोटे बोलले आहेत.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलCourtन्यायालय