शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

"राजीव गांधी दोनदा नापास झाले, तरीही काँग्रेसनं त्यांना पंतप्रधान बनवलं’’, मणिशंकर अय्यर यांचा स्वपक्षालाच टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:26 IST

Mani Shankar Aiyer News: वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या एका विधानामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी किंवा कुठल्या विरोधी पक्षातील नेत्याला नाही तर स्वत:च्या पक्षातीलच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे.

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या एका विधानामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी किंवा कुठल्या विरोधी पक्षातील नेत्याला नाही तर स्वत:च्या पक्षातीलच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे. मणिशंकर अय्यर यांच्या या विधानामुळे काँग्रेसची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर देशाचं नेतृत्व करणाऱ्या राजीव गांधींच्या पात्रतेबाबत मणिशंकर अय्यर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच अशा व्यक्तीला देशाचं पंतप्रधान बनवलं गेलं, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे. राजीव गांधी यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, राजीव गांधी एक विमान वैमानिक होते. मात्र ते दोन वेळा नापास झाले होते. केंब्रिज विद्यापीठात नापास होणं तसं कठीण आहे. कारण विद्यापीठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतं. तरीही राजीव गांधी नापास झाले. त्यानंतर ते इंपिरियल कॉलेज लंडन येथे शिक्षणासाठी गेले. तिथेही ते अपयशी ठरले. असा व्यक्तीला भारताचं पंतप्रधान कसं काय बनवलं गेलं, असा प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला.

मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार कुंवर दानिश अली यांनी सांगितले की, राजीव गांधी यांना देशात आयटी क्रांती आणि आधुनिकरणासाठी ओळखलं जातं. त्यांनी पंचायत राजची सुरुवाती केली होती.

दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या विधानानंतर भाजपा नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. मणिशंकर अय्यर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करताना अमित मायवीय यांनी लिहिले की, राजीव गांधी हे शैक्षणिकदृष्ट्या संघर्ष करत होते. केंब्रिज आणि इंपिरियल कॉलेज दोन्ही ठिकाणी ते अयशस्वी ठरले. तरीही त्यांना पंतप्रधान बनवण्यात आलं. गुपित उघड होऊ द्या, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.   

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर