शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

"राजीव गांधी दोनदा नापास झाले, तरीही काँग्रेसनं त्यांना पंतप्रधान बनवलं’’, मणिशंकर अय्यर यांचा स्वपक्षालाच टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:26 IST

Mani Shankar Aiyer News: वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या एका विधानामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी किंवा कुठल्या विरोधी पक्षातील नेत्याला नाही तर स्वत:च्या पक्षातीलच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे.

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या एका विधानामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी किंवा कुठल्या विरोधी पक्षातील नेत्याला नाही तर स्वत:च्या पक्षातीलच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे. मणिशंकर अय्यर यांच्या या विधानामुळे काँग्रेसची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर देशाचं नेतृत्व करणाऱ्या राजीव गांधींच्या पात्रतेबाबत मणिशंकर अय्यर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच अशा व्यक्तीला देशाचं पंतप्रधान बनवलं गेलं, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे. राजीव गांधी यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, राजीव गांधी एक विमान वैमानिक होते. मात्र ते दोन वेळा नापास झाले होते. केंब्रिज विद्यापीठात नापास होणं तसं कठीण आहे. कारण विद्यापीठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतं. तरीही राजीव गांधी नापास झाले. त्यानंतर ते इंपिरियल कॉलेज लंडन येथे शिक्षणासाठी गेले. तिथेही ते अपयशी ठरले. असा व्यक्तीला भारताचं पंतप्रधान कसं काय बनवलं गेलं, असा प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला.

मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार कुंवर दानिश अली यांनी सांगितले की, राजीव गांधी यांना देशात आयटी क्रांती आणि आधुनिकरणासाठी ओळखलं जातं. त्यांनी पंचायत राजची सुरुवाती केली होती.

दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या विधानानंतर भाजपा नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. मणिशंकर अय्यर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करताना अमित मायवीय यांनी लिहिले की, राजीव गांधी हे शैक्षणिकदृष्ट्या संघर्ष करत होते. केंब्रिज आणि इंपिरियल कॉलेज दोन्ही ठिकाणी ते अयशस्वी ठरले. तरीही त्यांना पंतप्रधान बनवण्यात आलं. गुपित उघड होऊ द्या, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.   

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर