शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन; वीकेंडला संपूर्ण राज्य बंद राहणार, सीमाही सील होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 9:41 AM

देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी अनलॉकमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणारपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत.

पंजाब : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच संकट काळात संपूर्ण देश अनलॉकच्या दिशेने पावले टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, पंजाब पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, पंजाब सरकारने आता शनिवार व रविवार आणि कोणत्याही सुट्टीच्या दिवशी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. ज्यामध्ये आवश्यक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजेच, शनिवार आणि रविवारी पंजाबमध्ये संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

पंजाबच्या सीमा पुन्हा एकदा सील केल्यानंतर पंजाबची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये आंतरराज्यीय बससेवा बंद करण्यात येईल. फ्लाइट, ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांना आता १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे, लागणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्तकरून  प्रवासाच्या इतिहासातून समोर आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी सामना करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विविध विभाग अधिकारी आणि मंत्र्यांच्या गट समितीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत कोरोनावर मात करण्यासाठी येत्या काही दिवसांत कठोर निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांकडून सल्ला घेण्यात आला होता.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना असे वाटते की, दिल्लीत सतत वाढणार्‍या कोरोना रुग्णांचा परिणाम पंजाबमध्येही होऊ शकतो. कारण, दररोज सरासरी ५०० ते ८०० वाहने दिल्लीतून पंजाबकडे येत आहेत. अशा परिस्थितीत पंजाब सरकार विचार करीत आहे की, कोरोनाची चाचणी दिल्ली आणि इतर राज्यातून पंजाबमध्ये येणाऱ्या लोकांसाठी अनिवार्य करावी. मात्र, याबाबत पंजाब पोलीस, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनलॉकमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणारकोरोना व्हायरस लॉकडाऊनमधून देश बाहेर पडत असताना आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी हे १६ व १७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी दोन टप्प्यांत संवाद साधणार आहेत. त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी १७ रोजी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसच्या महामारीचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधानांची ही मुख्यमंत्र्यांशी चर्चेची सहावी फेरी असेल. यापूर्वी त्यांनी ११ मे रोजी संवाद साधला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाबNarendra Modiनरेंद्र मोदी