शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

'न बोलवता पाकिस्तानात जाऊन बिर्याणी..', भगवंत मान यांची PM मोदींच्या परदेश दौऱ्यावर वादग्रस्त टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:29 IST

Punjab Chief Minister Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे.

Bhagwant Mann on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पाच देशांचा दौरा करून परतले. त्यांच्याया दौऱ्यावरुन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री मान म्हणाले की, पंतप्रधान अशा देशांमध्ये जातात, ज्यांची नाव कोणालाही माहिती नसतात. यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने मान यांच्या टिप्पण्या बेजबाबदार आणि खेदजनक असल्याचे म्हटले आहे. 

विधानसभेत बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित करण्याचा आपल्याला अधिकार नाही का? परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करण्याचा आपल्याला अधिकार नाही का? जेव्हा पाकिस्तानशी युद्ध झाले, तेव्हा जगातील कोणत्याही देशाने आम्हाला पाठिंबा दिला नाही. मग अशा परदेश दौऱ्यांचा काय फायदा? पंतप्रधान अशा देशांमध्ये जातात, ज्यांचे नावही कोणालाही माहिती नाही, त्यांना तिथे सर्वोच्च सन्मान दिला जातोय. त्या देशांची लोकसंख्या इतकी आहे की, जितके लोक आपल्या पंजाबमध्ये जेसीबी मशीन पाहण्यासाठी येतात.

जेव्हा पंतप्रधान विमानात बसतात, तेव्हा विचारतात की कोणता देश खाली आहे? मग तिथे विमान उतरवतात, अशी खोचक टीकाही मान यांनी केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१५ मध्ये अचानक झालेल्या पाकिस्तान दौऱ्याचा संदर्भ देत एक व्यंग्यात्मक टिप्पणीही केली. ते म्हणाले की, सामान्य नागरिक पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत, परंतु पंतप्रधान निमंत्रण नसताना बिर्याणी खाण्यासाठी तिथे पोहोचतात. आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र देऊ नका, आम्ही बलिदान देऊन देश स्वतंत्र केला आहे.

त्यांनी दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी ३' या चित्रपटाभोवतीच्या वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, दिलजीत दोसांझच्या चित्रपटावर प्रश्न उपस्थित केले जातात. पाकिस्तानमध्येही लोक पंजाबी बोलतात, आपली संस्कृती त्यांच्याशी सामायिक आहे. म्हणूनच तिथल्या एका कलाकाराने दिलजीतच्या चित्रपटात काम केले. हा चित्रपट ऑपरेशन सिंदूरच्या आधी बनवण्यात आला होता, आता ते म्हणतात की चित्रपट प्रदर्शित होऊ नये. पंतप्रधानांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवले अशी त्यांची जाहिरात येते, पण ते पंजाब आणि हरियाणामधील वाद संपवू शकत नाहीत, असेही मान म्हणाले. 

पंतप्रधान मोदींचा परदेश दौरापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ५ देशांना भेट दिली. पंतप्रधानांनी २ जुलै रोजी आपला दौरा सुरू केला, जो ९ जुलै रोजी पूर्ण झाला. या काळात पंतप्रधानांनी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाला भेट दिली. ते ब्राझीलमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेतही सहभागी झाले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मानIndiaभारतPakistanपाकिस्तान