शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाकिस्तानवर राजनैतिक बहिष्कार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाही काढणार; केंद्र सरकारचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 11:07 IST

पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. 

ठळक मुद्देकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने, दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याचा निर्धार केला आहे.पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं अख्खा देश सुन्न झाला आहे. सीआरपीएफच्या ३७ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतानाच, या हल्ल्याचा उरीसारखा बदला घ्या, अशी तीव्र भावना व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने, दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याचा निर्धार केला आहे.

पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. पुलवामा दहशतवादी हल्लासंबंधीच्या प्रत्येक ठळक बाबीवर या बैठकीत चर्चा झाली. हा हल्ला घडवणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अरुण जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला तिन्ही दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही उपस्थित होते. सुमारे ५५ मिनिटं ही बैठक चालली. सुरुवातीला २ मिनिटं मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर, जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानला हिसका दाखवण्याची रणनीतीही बैठकीत आखण्यात आली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला वेगळं पाडण्याच्या दृष्टीने परराष्ट्र मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही अरुण जेटली यांनी दिली. तसंच, पाकिस्तानला १९९६ मध्ये देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यासाठी आवश्यक सूचना वाणिज्य मंत्रालय लवकरच प्रसिद्ध करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ३३ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रामध्ये भारताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात एक प्रस्ताव ठेवला होता. परंतु,  दहशतवादाची नेमकी व्याख्या काय, यावरून मतमतांतरं आल्यानं तो अद्याप मंजूर झालेला नाही. हा प्रस्ताव संमत करून घेण्यासाठीही प्रयत्न केले जातील आणि पाकिस्तानची आणखी कोंडी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. सीआरपीएफवरील या हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल, असंही त्यांनी ठणकावलं. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज काश्मीरला जाऊन उद्या सर्वपक्षीय नेत्यांना घटनेबाबत माहिती दिली जाईल, असंही जेटलींनी नमूद केलं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटलीAjit Dovalअजित डोवाल