शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

Pulwama Attack : युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबा, देशभर दु:ख, संताप अन् बदल्याची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 05:12 IST

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबाकाश्मीर मिळविण्यासाठी दोन युद्धात हरूनही पाकिस्तानने प्रयत्न चालूच आहेत. पुलवामातील हल्ला हा त्याचाच भाग. दुसऱ्या युद्धात रशियाने ‘विंटर नीती’ अवलंबून जर्मन सैन्य अन्न पाण्यावाचून मारले आणि त्यांचा पराभव केला. पाकिस्तानची जगभरातून रसद बंद करुन निर्णायक घाव घालायचा. अशी रणनीती खेळण्याचा धूर्तपणा मोदींकडे आहे.- कमलाकर बडवे, ४९८, नारायण पेठ, पुणे.कठोर उपाययोजनांची गरजअमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने जशी कठोर पावले उचलली तशी भारतानेही उचलण्याची गरज आहे. दहशतवाद हा विषय सर्व जगासाठी चिंतेचा आहे. त्यामुळे भारताने निर्णायक पाऊल उचलल्यास जगभरातून निश्चितच पाठिंबा मिळेल.- माणिकराव गावीत, नवापूर - नंदुरबार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री.दबाव वाढवाभारताविरुद्धच्या दहशतवादाला पाकिस्तानची रसद आहे. त्यांना चीनदेखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करते. युद्धाच्या पटलावर असे नेपथ्य असताना सर्व राजकीय पक्षांनी दबाव वाढविण्यासाठी अगोदर एकत्र आले पाहिजे. २४ तास सुरक्षा देणाºया सैनिकांकडून एखादी चूक होऊ शकते. नेहमी सर्जिकल स्ट्राईक करणेही योग्य नाही. नियोजन केल्यास आपण अतिरेक्यांना चपराक बसणारे उत्तर देऊ शकतो.- विजय नातू, निवृत्त ब्रिगेडीयर, चाळीसगाव, जि. जळगाव.पाकची आर्थिक कोंडी कराविरोधी पक्षात असताना ‘पाच के बदले पचास’ म्हणणारे सत्तेत आल्यावर मात्र अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी ठोस कृती करीत नाही. केवळ सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तान सुधारणार नाही त्याही पेक्षा मोठी कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांना मदत करणाºया पाकिस्तानसारख्या सर्वच देशांची आर्थिक कोंडी करावी.- श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड, जि. पुणेधर्मप्रमुखांनी एकत्र यावेसर्व धर्मप्रमुखांनी एकत्र बसून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी विचार करण्याची गरज आहे. कारण सध्याचा दहशतवाद हा धार्मिक आधारावर होत असल्याचे दिसते किंवा तसे धार्मिक आधाराचे वलय त्याला प्राप्त झालेले आहे. म्हणून मूठभर लोकांकडून होत असलेला हा दशतवाद रोखण्यासाठी धर्म प्रमुखांनीच पुढे यायला हवे.- डॉ. दत्ताराम देसाई, (समाजसेवक), सावईवेरे-फोंडा, गोवा

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीIndiaभारत