शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack : युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबा, देशभर दु:ख, संताप अन् बदल्याची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 05:12 IST

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबाकाश्मीर मिळविण्यासाठी दोन युद्धात हरूनही पाकिस्तानने प्रयत्न चालूच आहेत. पुलवामातील हल्ला हा त्याचाच भाग. दुसऱ्या युद्धात रशियाने ‘विंटर नीती’ अवलंबून जर्मन सैन्य अन्न पाण्यावाचून मारले आणि त्यांचा पराभव केला. पाकिस्तानची जगभरातून रसद बंद करुन निर्णायक घाव घालायचा. अशी रणनीती खेळण्याचा धूर्तपणा मोदींकडे आहे.- कमलाकर बडवे, ४९८, नारायण पेठ, पुणे.कठोर उपाययोजनांची गरजअमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने जशी कठोर पावले उचलली तशी भारतानेही उचलण्याची गरज आहे. दहशतवाद हा विषय सर्व जगासाठी चिंतेचा आहे. त्यामुळे भारताने निर्णायक पाऊल उचलल्यास जगभरातून निश्चितच पाठिंबा मिळेल.- माणिकराव गावीत, नवापूर - नंदुरबार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री.दबाव वाढवाभारताविरुद्धच्या दहशतवादाला पाकिस्तानची रसद आहे. त्यांना चीनदेखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करते. युद्धाच्या पटलावर असे नेपथ्य असताना सर्व राजकीय पक्षांनी दबाव वाढविण्यासाठी अगोदर एकत्र आले पाहिजे. २४ तास सुरक्षा देणाºया सैनिकांकडून एखादी चूक होऊ शकते. नेहमी सर्जिकल स्ट्राईक करणेही योग्य नाही. नियोजन केल्यास आपण अतिरेक्यांना चपराक बसणारे उत्तर देऊ शकतो.- विजय नातू, निवृत्त ब्रिगेडीयर, चाळीसगाव, जि. जळगाव.पाकची आर्थिक कोंडी कराविरोधी पक्षात असताना ‘पाच के बदले पचास’ म्हणणारे सत्तेत आल्यावर मात्र अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी ठोस कृती करीत नाही. केवळ सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तान सुधारणार नाही त्याही पेक्षा मोठी कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांना मदत करणाºया पाकिस्तानसारख्या सर्वच देशांची आर्थिक कोंडी करावी.- श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड, जि. पुणेधर्मप्रमुखांनी एकत्र यावेसर्व धर्मप्रमुखांनी एकत्र बसून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी विचार करण्याची गरज आहे. कारण सध्याचा दहशतवाद हा धार्मिक आधारावर होत असल्याचे दिसते किंवा तसे धार्मिक आधाराचे वलय त्याला प्राप्त झालेले आहे. म्हणून मूठभर लोकांकडून होत असलेला हा दशतवाद रोखण्यासाठी धर्म प्रमुखांनीच पुढे यायला हवे.- डॉ. दत्ताराम देसाई, (समाजसेवक), सावईवेरे-फोंडा, गोवा

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीIndiaभारत