शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

CAAमध्ये नागरिकत्व हिरावण्याची तरतूद? सिद्ध करून दाखवा; अमित शाहांचे राहुल गांधींना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 4:23 PM

म्हणून देशात लागून केला नागरिकत्व दुरुस्ती कायदा...

सिमला -  नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशातील राजकारण तापलेले आहे. दरम्यान, यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे अल्पसंख्याकांचे नागरिकत्व काढून घेतले जाणार अशी अफवा काँग्रेस आणि कंपनी पसरवत आहे. मात्र राहुल गांधीजी मी तुम्हाला आव्हान देतो की या कायद्यात कुठेही कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद आहे का? हे सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हान अमित शाह यांनी दिले आहे. राहुल गांधींवर घाणाघाती टीका करताना अमित शाह म्हणाले की, ''मी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, सर्वप्रथम नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समजून घ्या आणि नंतर इतरांनाही समजावून सांगा. नाहीतर खोटारडेपणा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे राजकीय पक्ष आपल्या व्होटबँकेच्या राजकारणासाठी आपल्याला एकमेकांविरोधात असेच लढवत राहतील.''

  यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायदा का लागू केला याचेही कारण अमित शाह यांनी सांगितले. 1950 मध्ये नेहरू आणि लियाकत यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्याकांचे रक्षण करतील, मात्र लाखो-कोट्यवधी निर्वासितांची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळेच हा कायदा आणावा लागला आहे, असे शाह यांनी सांगितले. तसेच जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्याने आता काश्मीरमध्ये तिरंगा डौलाने फडकत आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.  दरम्यान, राहुल गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करताना हा कायदा असंवैधानिक असून, एनआरसी आणि एपीआर हे गरीब नागरिकांवर कर आकारण्यासारखे आहेत, असा टोला लगावला आहे.   

टॅग्स :Amit Shahअमित शहाRahul Gandhiराहुल गांधीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारण